Ashadhi Wari 2024 sakal
पुणे

Ashadhi Wari 2024 : पोलिसांच्या अरेरावीने दिंडीकऱ्यांना मनस्ताप

सातारा पोलिसांची अरेरावी आणि वाहतूक व्यवस्थेच्या ढिसाळ यंत्रणेचा माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दिंडीतील वारकऱ्यांना बुधवारी मनस्ताप झाला.

सकाळ वृत्तसेवा

सातारा पोलिसांची अरेरावी आणि वाहतूक व्यवस्थेच्या ढिसाळ यंत्रणेचा माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दिंडीतील वारकऱ्यांना बुधवारी मनस्ताप झाला. फलटण शहरातून दिंड्यांची वाहने बरडकडे सोडण्यावरून शाब्दिक चकमक झाली. यामध्ये पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त ज्ञानेश्वर जळगावकर यांनाही एका पोलिस अधिकाऱ्याने आत टाकू का? अशी दमबाजी केली.

तर फलटणच्या पालखी तळावरून रथ बाहेर काढतेवेळी बाळासाहेब चोपदार, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, भावार्थ देखणे यांनाही पोलिसांच्या अरेरावीचा सामना करावा लागला. त्यानंतर पिंप्रदमध्ये अप्पर पोलिस अधीक्षक आचल दलाल, पोलिस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांनी झाल्या प्रकाराबाबत आणि आळंदी देवस्थान विश्वस्त मंडळ आणि बाळासाहेब चोपदार यांच्याबरोबर चर्चा केली. वाहतूक यंत्रणेत पोलिसांच्या भूमिकेबद्दल विश्वस्तांनी सातारा पोलिस यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त केली. प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप उपस्थित होते.

अधिकाऱ्याला समज

अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्याला समज दिली असल्याचे दलाल आणि धस यांनी सांगितले. उद्याचा बंदोबस्त सुरळीत राहील, अशी ग्वाही दिली. सोलापूर हद्दीतील वरिष्ठांनाही पुढील बंदोबस्ताबाबत सांगून वारकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच, बरड येथे माऊलींच्या तंबूमध्ये पोलिस अधिकारी आणि पालखी सोहळाप्रमुख, विश्वस्त यांची पुन्हा बैठक झाली. या वेळी ज्ञानेश्वर जळगावकर यांना अरेरावी केलेल्या फलटणमधील पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी झाल्याप्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आणि वादावर पडदा पडला. यावेळी साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.

पालखी सोहळा सातारा जिल्हा हद्दीत आल्यानंतर पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेत अनेक त्रुटी राहिल्या. पोलिसांची संख्या केवळ कागदोपत्रीच आहे. सकाळी पोलिस बंदोबस्त नसल्याने आम्ही रस्त्यावर उतरून रथाला जागा करून दिली. त्यात रथाबरोबर दिंड्याची जेवणाची व तंबूची वाहने जाणे महत्त्वाचे असते. ती वाहने न सोडल्याने गैरसोय झाली.

- योगी निरंजननाथ, पालखी सोहळाप्रमुख

रस्त्याचे काम सुरू असल्याने गुरुवारी बरड गावातून बाहेर पडताना पोलिसांनी प्रभावीपणे बंदोबस्त देणे गरजेचे आहे. सोहळ्यातील नियोजनाच्या बैठकीत बंदोबस्ताबाबत ठरल्याप्रमाणे पोलिस प्रशासनातील वरिष्ठांनी दिलेले आदेश खालच्या स्तरावर पोचत नसल्याने गोंधळ होत आहे. वारकरी आणि दिंड्यांना पोलिसांकडून वागणूक सौजन्याची असावी.

- भावार्थ देखणे, विश्वस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT