Sarpanch 
पुणे

पुण्यातील या सहा गावांत होणार सरपंचांची थेट निवड

सकाळवृत्तसेवा

पुणे - एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये पुणे जिल्ह्यातील अवघ्या सहा गावांचा समावेश आहे. या गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. सहा मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत बंद केली असली तरी या सहा गावांचे सरपंच मात्र थेट जनतेतूनच निवडले जाणार आहेत. अशा पद्धतीने थेट सरपंच निवडली जाणारी जिल्ह्यातील ही शेवटचीच सहा गावे ठरणार आहेत. 

यात पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्‍यातील मुर्टी, मोराळवाडी, खराडेवाडी, पुरंदर तालुक्‍यातील आस्करवाडी आणि भिवरी आणि दौंड तालुक्‍यातील बिरोबावाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

तत्कालीन राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता, त्यासाठी ग्रामपंचायत कायद्यात दुरुस्तीही केली होती. यानुसार आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील ६२९ गावांचे सरपंच थेट जनतेतून निवडले गेले आहेत. नव्या सरकारने सरपंचांची निवड ही ग्रामपंचायत सदस्यांमधूनच बहुमताच्या आधारावर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाबाबतचा वटहुकूम काढण्यास राज्यपालांनी नकार दिला आहे, त्यामुळे सरकारला पुन्हा एकदा ग्रामपंचायत कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे. संबंधित दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना रक्कम अदा झाल्यास त्याबाबत राज्य सरकारला कळविण्यात यावे, असा आदेश अतिरिक्त सचिव प्रल्हाद रोडे यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price: महत्त्वाची बातमी! पेट्रोलचे दर वाढले; वाहनधारकांना मोठा फटका, नवे दर किती? जाणून घ्या...

Mayor: इटालियन फ्लोअरिंग, कौलारू छत, विशेष रूम अन्...; BMC च्या महापौर बंगल्याचा कायापालट होणार, कोणते बदल आणि खर्च किती?

'अगं अगं सुनबाई..' नंतर केदार आणि सना शिंदे यांचा नवा सिनेमा ‘आई भाड्याने हवी?’

Pune Fraud News : पाणी व्यवसायाच्या नावाखाली बाप-लेकांकडून दोन कोटी ३४ लाखांची फसवणूक; बाप-लेकांवर गुन्हा दाखल

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

SCROLL FOR NEXT