balgandharva auditorium sakal
पुणे

बालगंधर्व रंगमंदिरात पाण्यासाठी रोज टँकर मागविण्याची नामुष्की

बालगंधर्व रंगमंदिराला महापालिकेडूनच पुरेसा पाणी पुरविले जात नाही. कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे रोज टँकर मागविण्याची नामुष्की ओढावली.

​ ब्रिजमोहन पाटील

बालगंधर्व रंगमंदिराला महापालिकेडूनच पुरेसा पाणी पुरविले जात नाही. कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे रोज टँकर मागविण्याची नामुष्की ओढावली.

पुणे - नाटक, लावणी यासह इतर सांस्कृतीक कार्यक्रम, महत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती व रसिकांची गर्दी रोज बालगंधर्व रंगमंदिरात पाहायला मिळते. पण अशी स्थिती असताना बालगंधर्व रंगमंदिराला महापालिकेडूनच पुरेसा पाणी पुरविले जात नाही. कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे रोज टँकर मागविण्याची नामुष्की ओढावली असून, महापालिका प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

बालगंधर्व रंगमंदिरचा पुनर्विकास करण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे सुधारित आराखडा तयार केला जात आहे. कलाकार, नाट्यरसिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, त्याचा आनंद घेता यावा यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे नाट्यगृह उभारले जाईल असा दावा महापालिका करत आहे. मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या बालगंधर्वची स्वच्छता, मूलभूत सुविधांकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. अवघ्या दोन दिवसांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने बालगंधर्व च्या डागडुजीकडे लक्ष दिले आहे.

स्थापत्य व विद्युत विषयक कामे करण्यासाठी संबंधित विभागाकडून गडबड सुरू आहे, काही दिवसांपूर्वी बंद पडलेला एसी दुरुस्त करण्यात आला आहे. तसेच स्वच्छता गृह, चेंबर्सच्या देखभालीकडे लक्ष दिले आहे. असे असताना बालगंधर्व रंगमंदिर आतील पाण्याचा प्रश्न समोर आलेला आहे.

पाणी पुरवठा विभागाने बालगंधर्व रंगमंदिरासाठी स्वतंत्र नळजोड दिलेला आहे. याच जलवाहिनीवर मेट्रो आणि पोलिसांनी नळ जोड घेतल्याने गेल्या चार-पाच महिन्यांपासून बालगंधर्वला कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे टाकी भरत नसल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे रोज सकाळी दोन व सायंकाळी दोन असे चार टँकर मागवून येथे पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

राष्ट्रपती दौऱ्यामुळे टाकी घेतली भरून

राष्ट्रपती कोविंद हे २७ मे रोजी बालगंधर्व रंगमंदिरात येणार आहेत. २६ मे पासून रंगमंदिराचा परिसर प्रतिबंधित केला जाणार आहे. यावेळी पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी बालगंधर्व प्रशासनाने टाकी भरून घेतली आहे.

‘बालगंधर्वला पाणी पुरवठा केली जाणारी जलवाहिनी जुनी झाल्याने तेथे कमी दबाने पाणी पुरवठा होत आहे. भवन विभागाला ही जलवाहिनी बदलण्यास सांगण्यात आले आहे.’

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा

‘पाणी पुरवठा हा अत्यावश्‍यक बाब आहे, त्यामुळे बालगंधर्वच्या देखभाल दुरुस्तीसाठी असलेल्या तरतुदीतून हे काम केले जाईल.’

- हर्षदा शिंदे, प्रमुख, भवन विभाग

‘बालगंधर्व रंगमंदिराला पाणी कमी येत असल्याने यापूर्वीच पाणी पुरवठा विभाग आणि भवन विभागाला कळविण्यात आले आहे. पण अद्याप काम झालेले नाही. सध्या टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.’

- संतोष वारूळे, उपायुक्त, सांस्कृतिक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मुंबई पुणे एक्सप्रेस वे'वर वाहतूक कोंडीतही टोल वसुली, मनसेच्या दणक्यानंतर पैसे परत करण्याचं IRBचं आश्वासन

T20 WC, IND vs PAK: भारतीयांसमोर पाकच्या फिरकीचे आव्हान; सायंकाळपर्यंत पावसाचा अंदाज, मात्र त्यानंतर खेळ होण्याची शक्यता

CM Yogi Adityanath: लाडक्या बहिणींना १५०० रुपये पेन्शन; योगी सरकारची मोठी योजना, पाहा कोणा-कोणाला होणार फायदा

Ind vs Pak: यालाच म्हणतात तयारी! पाकिस्तानला भिडण्यासाठी सूर्यकुमार यादव बनला ‘उस्मान तारिक’, नेट्समध्ये गोलंदाजीची हुबेहूब नक्कल

Satara Tourist Death: सातारच्या पर्यटकाचा राजगडावर हृदयविकाराने मृत्यू; सकाळीच्या सुमारास बालेकिल्ल्याचे दर्शन घेतलं अन् काय घडलं?

SCROLL FOR NEXT