pune sakal
पुणे

Pune : डॉ. बबन जोगदंड यांना पर्यावरणमित्र पुरस्कार

शैक्षणिक व पर्यावरणविषयक कार्याची घेतली दखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : यशदा पुणे येथील माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या शैक्षणिक व पर्यावरणविषयक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण व पर्यावरणमित्र पुरस्कार देऊन राजभवनामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले.

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाच्या औचित्याने राजभवन मुंबईत झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे प्रमुख व समाजसेवक चंद्रकांत शहासने यांनी लिहिलेल्या ‘पर्यावरण विचार’ या पुस्तिकेचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते झाले. याच कार्यक्रमात शिक्षण व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील काही जणांना राष्ट्रीय पर्यावरणमित्र पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यामध्ये डॉ. जोगदंड यांचा समावेश होता. डॉ. जोगदंड यांनी शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय, पर्यावरणविषयक क्षेत्रात भरीव काम केले आहे. या कामाची दखल घेऊन त्यांना ‘राष्ट्रीय पर्यावरण व शिक्षण मित्र पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. डॉ. जोगदंड यांनी आतापर्यंत १५ विषयात पदव्या संपादन केल्या असून जवळपास आठ विषयांमध्ये प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. यशदाच्या ‘यशमंथन’ या मासिकाचे ते संपादक आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: फक्त 'या' कारणांमुळे सोन्याचे भाव कोसळले; आज काय आहे 24 कॅरेचा भाव?

Monsoon Kitchen Care: पावसाळ्यात स्वयंपाकघरातील दमटपणा कमी करायचाय? मग 'या' गोष्टी नक्की करा

Khadakwasla Dam: 1961 चा महापूर… पण खडकवासला धरण वाचलं कसं? अज्ञात इतिहास वाचा

Rain-Maharashtra Latest live news update: NDA कडून सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीचा अर्ज भरला

Asia Cup 2025 Explainer : श्रेयस अय्यरने आणखी काय करायला हवं? आगरकर म्हणाला, ना त्याची चूक, ना आमची...; मग दोष कुणाचा?

SCROLL FOR NEXT