पत्रकार भवन - "निसर्गाने दिला आनंदकंद' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना डॉ. माधव गाडगीळ. व्यासपीठावर (डावीकडून) श्रीराम पवार आणि डॉ. विजय केळकर. 
पुणे

तंत्रज्ञानामुळे वनसंवर्धनात क्रांती - डॉ. गाडगीळ

सकाळ वृत्तसेवा

पुणे - 'नव्या तंत्रज्ञानामुळे तरुणांच्या हातात स्मार्ट फोन आले. त्यातून अक्षांश- रेखांश अचूक कळू लागले आणि त्याचा वापर जंगल संवर्धनासाठी होऊ लागला. नव्या तंत्रज्ञानामुळे एक प्रकारची क्रांती व्हायला लागली आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले.

डॉ. गाडगीळलिखित "निसर्गाने दिला आनंदकंद' या पुस्तकाचे प्रकाशन अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी "सकाळ'चे संचालक संपादक श्रीराम पवार उपस्थित होते. "सकाळ' प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

डॉ. गाडगीळ म्हणाले, 'गडचिरोलीमधील गावांनी सामूहिकपणे वनसंपत्ती जपली. वनअधिकारामुळे ती तेथील नागरिकांच्या हातात आहे. वनसंवर्धनाची जोपासना करण्याला शास्त्रीय जोड देण्यासाठी पाच अभ्यासक्रम राज्य सरकारने सुरू केले. या अभ्यासक्रमात सहभागी होणाऱ्या मुला-मुलींची निवड ग्रामसभेतून होते. त्यातून वेगळ्याच पातळीवर काम करणारे लोक तयार होत आहेत. कारण, त्यांना तेथील वनांचे, वनस्पतींचे प्रचंड आकलन आहे. रोज जगताना ते हेच पाहात असतात. त्याला शास्त्रीय ज्ञानाची जोड दिल्याने ते खूप व्यवस्थित काम करायला लागले आहेत.''

'स्मार्ट फोनच्या रूपात खूप शक्तिमान संगणक त्यांच्या हातात आले आहेत. अक्षांश-रेखांश दाखवणे हे स्मार्ट फोनमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे जंगलांच्या सीमा निश्‍चित होतात. त्या सीमा "अपलोड' करू शकतात. तो नकाशा मिळतो. त्यातून माहिती मिळते. हे सगळे करायला ही मुले भराभर शिकत आहेत,'' असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. केळकर म्हणाले, 'या पुस्तकातून डॉ. गाडगीळ यांनी फक्त माहिती नाही, तर विचार मांडले आहेत, त्यामुळे हे पुस्तक शाळेच्या पाठ्यपुस्तकात असावे, इतके ते महत्त्वाचे आहे.''

पवार म्हणाले, 'या पुस्तकाला शास्त्रीयच नाही, तर साहित्याचाही साज आहे. डॉ. गाडगीळ यांचा अनुभव, संशोधन, चिंतन या सगळ्याचा सार पुस्तकरूपात आला आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT