पुणे : खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने मातीमिश्रित पाणी वाहून येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाणी उकळून व गाळून द्यावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पाण्यासोबत माती वाहून येण्याचे प्रमाण जास्त असल्याने हे पाणी गढूळ आहे.
हेच पाणी जलवाहिनीतून महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात येत आहे. याठिकाणी पाणी शुद्ध करून नागरिकांना पुरविले जात आहे. पण तरीही नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन महापालिकेने केले आहे. दरम्यान, पाण्याची गढूळतेचे (टर्बिडीटी) १० पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सध्या हे टर्बिडीटीचे प्रमाण ८ वरून १४ वर गेले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.