custerd apple.jpg 
पुणे

सिताफळांना पावसाचा तडाखा

प्रवीण डोके

मार्केट यार्ड (पुणे) : यंदा राज्यात पडलेल्या सततच्या पावसामुळे आणि धुक्यामुळे सिताफळांच्या बागांवर विपरित परिणाम झाला आहे. सिताफळाच्या देठाजवळ काळे डाग पडून त्यावर बुरशीचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. आधी कोरोनाचा फटाका त्यात पुन्हा काळ्या डागांच्या बुरशी रोगामुळे सिताफळाच्या व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

सध्या मार्केट यार्डात सिताफळाची एकूण १० ते १५ टन आवक असून निम्मे सिताफळ काळया डागांच्या बुरशीमुळे खराब येत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना बसत आहे. घाऊक बाजारात सध्या प्रतिकिलो 5 ते 60 रुपये भाव मिळत आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा ग्राहकांकडून सिताफळांची मागणी घटली आहे. कोरोनाचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. जर नेहमीसारखी परिस्थिती असती तर सिताफळाला प्रतिकिलोला 10 ते 100 रुपये भाव मिळाला असता असे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पावसाळा सुरू होताच घाऊक फळबाजारात सिताफळ दाखल होतात. ‘काळे डाग असल्याने विक्री होण्यास त्रास होत आहे. त्यामुळे  गेल्या वर्षींच्या तुलनेत २० ते २५ टक्के एवढाच दर मिळाला. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे ७५ टक्के नुकसान झाले आहे. या वर्षी झाडाला ३० ते ४० टक्के उत्पादन मिळाले आहे. बाहेरील राज्यात चांगल्या सिताफळाची विक्री होऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. इतर प्रक्रिया उद्योगांकडून मागणी नसली तरी हातगाडी, फेरीवाले तसेच टेम्पोमधून माल विक्री करणार्‍यांकडून मागणीचे प्रमाण काहीसे वाढत आहे. घाऊक बाजारात फळांना भाव मिळत नसल्याने बहुतांश शेतकर्‍यांकडून जागेवरच मालाची विक्री करण्यात येत आहे. परंतु उत्पादनाच्या तुलनेत मागणी कमी असल्याने दरात घट झाली आहे, अशी खंत व्यापारी युवराज काची यांनी व्यक्त केली.

का मिळतोय कमी भाव 
- काळया डागांच्या बुरशीमुळे झालेले नुकसान
- कोरोनाच्या साथीमुळे आईस्क्रिम उद्योग, प्रक्रीया उद्योग, हॉटेल, मंगल कार्यालय बंद
- ७० टक्के माल हा पल्प उत्पादकांकडून तर ३० टक्के माल इतर ग्राहकांकडून खरेदी केला जातो
- इतर राज्यांमध्ये सिताफळ पाठवण्यासाठी रेल्वे, विमानसेवा व मर्यादा

येथे घेतले जाते उत्पादन 
सिताफळाचे उत्पादन पुरंदर तालुक्यासह सासवड, वाघापूर, गुऱ्होळी, वडकी, फुरसुंगी, शिरूर, नायगाव, पिसर्वे, काळेवाडी, सोनोरी, पिंपळे, बारामती, इंदापूर, शिरुर, जालना, सोलापूर या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

दहा किलो सिताफळातून ३३० ग्रॅम पल्प

दहा किलो सिताफळातून जवळपास ३३० ग्रॅम पल्प निघतो. या प्रकल्पाअंतर्गत 2 हजार टनाहून अधिक माल पल्प आणि पावडर स्वरुपात तयार करून ठेवण्यात येतो. साधारण 10 महिने हा माल टिकत असल्याने त्याचा मागणीनुसार पुरवठा करण्यात येतो.
 

प्रतिकूल वातावरणामुळे सिताफळाच्या देठाकडील भागात दव आणि पावसाचे पाणी साचून तेथे बुरशी निर्माण होते. त्या ठिकाणी सिताफळाच्या पेशी मृत होऊन काळे डाग पडू लागतात. त्यामुळे ग्राहक असे सिताफळ घेणे नापसंत करतात. त्यामुळे दर कमी मिळून नुकसान होते.
- नितीन कुंजीर, शेतकरी व व्यापारी मार्केट यार्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT