edible oil  e-sakal
पुणे

खाद्यतेलाचे भाव दोनशे रुपयांनी उतरले; मागणीत घट

पंधरा दिवसांतील स्थिती, कडक निर्बंधाचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खाद्यतेलाचे भाव गेल्या वर्षभरात सातत्याने वाढत असून, १५ किलोच्या डब्यामागे साधारणतः ८०० ते १००० रुपयांची त्यामध्ये वाढ झाली आहे. मात्र, मागील पंधरा दिवसात २०० रुपयांनी भावात घट झाली आहे. कडक निर्बंध, विवाह समारंभ, हॉटेल, केटरिंग, खाणावळी बंद आहेत. त्यामुळे पुणे, मुंबईसह देशातून ३० ते ४० टक्क्यांनी खाद्यतेलाची मागणी घटली आहे, त्याचा हा परिणाम आहे.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दळणवळणावर मर्यादा आल्या आहेत. व्यवहार बंद झाले आहेत. त्याचा व्यापारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तेलाच्या खरेदीविक्रीवरही परिणाम झाल्याचे चित्र असल्याचे तेलाचे व्यापारी रायकुमार नहार यांनी सांगितले.

तेलाची बदलती परिस्थिती

तेलाचे प्रकार - मे २०२० - एप्रिल २०२१ - मे २०२१

सूर्यफूल रिफाईंड ः १५४० ते १६०० - २५०० ते २७०० - २३०० ते २५००

सोयाबीन ः १३४० ते १४४० - २४०० ते २५०० - २३०० ते २४००

सरकी तेल ः १३२० ते १४१० - २५५० - २४५०

वनस्पती ः १००० ते १२०० - १८५० ते २१०० - १८०० ते २०३०

पाम तेल ः १२३० ते १३१०- २२०० - २०५०

शेंगदाणा ः १६५० - २७५० - २६३०

oil

सत्तर टक्के तेल आयात

भारतात दरवर्षी एकूण मागणीच्या सुमारे ७० टक्के खाद्यतेलाची आयात केली जाते तर देशात मागणीच्या ३० टक्के खाद्यतेलाची निर्मिती केली जाते. केंद्र सरकारचे तेलावरील आयात शुल्क जास्त आहे. त्यामुळे खाद्यतेलांच्या दरवाढीवर मोठा परिणाम झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranjeet Kasale Arrest : वादग्रस्त बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेला अटक, गुजरात पोलिसांची लातूरमध्ये मध्यरात्री कारवाई

Latest Marathi News Live Update : वसुबारसपासून दीपोत्सवाला सुरुवात; आज अभ्यंगस्नानाचा मुख्य दिवस

Ashok Kumar passed Away: १९७१ च्या रणसंग्रामातील नायक हरपला; वीर चक्र विजेते, कमांडर अशोक कुमार यांचे निधन

दिवाळीत दिल्ली-NCRमध्ये हवा बनली विषारी, श्वास घेणंही कठीण; AQI ४००च्या वर, १२ कलमी अ‍ॅक्शन प्लॅन लागू

Solapur Accident: इंचगावजवळ अपघातात एक ठार, एक जखमी; पिकअपची दुचाकीला मागून धडक; राष्ट्रीय महामार्गावर घटना..

SCROLL FOR NEXT