Untitled-3.jpg
Untitled-3.jpg 
पुणे

एल्गार व माओवादी संबंध प्रकरणाची सुनावणी मुंबईत चालणार? 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एल्गार आणि माओवादी संबंध प्रकरणी येथील विशेष न्यायालयात सुरू असलेली सुनावणी यापुढे मुंबई येथील एनआयएच्या विशेष न्यायालयात चालवली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपास अधिकाऱ्यांनी बुधवारी येथील विशेष न्यायालयात अर्ज करत या प्रकरणाचे कागदपत्र पुरविण्यात यावे. तसेच यापुढे हा खटला मुंबई उच्च न्यायालयात असलेल्या एनआयएच्या विशेष न्यायालयात चालवण्यात यावा, अशी विनंती केली आहे.

प्रकरणाचा तपास अधिक सविस्तरपणे करता यावा म्हणून एनआयएने त्यांच्या प्रक्रियेनुसार नवीन एफआयआर देखील दाखल केली आहे. या सर्वांवर येथील विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी सरकारी वकील आणि बचाव पक्षाचा आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. तीन फेब्रुवारी रोजी यावर सुनावणी होणार असून, त्याच दिवशी निकाल होण्याची शक्यता आहे.

एनआयए तपास करीत असलेल्या प्रकरणाचा खटला चालवण्याचे अधिकार पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील एका न्यायालयाकडे आहे. मात्र असे असताना एनआयएने हे प्रकरण मुंबईत चालवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या पुढील सुनावणी मुंबईत होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT