पुणे : कोरोना विषाणू आजाराचा प्रादुर्भाव असलेल्या भागातून राज्यात येणा-या पाच हजार 128 प्रवाशांचे गुरुवारपर्यंत मुंबई विमानतळावर स्क्रिनिंग करण्यात आले आहे. त्यातील बाधित भागातून आलेले महाराष्ट्रातील 36 प्रवासी आढळले आहेत. त्यापैकी 12 प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे.
कोरोनाला घाबरू नका; अशा प्रकारे घ्या काळजी
मुंबई व पुण्यात प्रत्येकी पाच, तर नांदेड व नागपूर येथे प्रत्येकी एक प्रवासी विलगीकरण कक्षात आहे. मुंबईत दाखल असलेल्या तिघांना गुरुवारी घरी सोडण्यात आले होते. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला (एनआयव्ही) येथे भेट देऊन कोरोना विषयक प्रतिबंध व नियंत्रण उपाय योजनांची माहिती घेतली.
आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी कोरोना संदर्भात विभाग करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. भरती प्रवाशांपैकी नऊ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह असल्याबाबतचे अहवाल एनआयव्हीने दिला आहे. तर उर्वरित तीन रुग्णांचे अहवाल शनिवारपर्यंत मिळणार असल्याचे एनआयव्हीने स्पष्ट केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.