पुणे - मेट्रो प्रकल्पाच्या कामात गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल अडथळा ठरत असल्याने तो पाडण्यात येणार आहे.
पुणे - मेट्रो प्रकल्पाच्या कामात गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल अडथळा ठरत असल्याने तो पाडण्यात येणार आहे. 
पुणे

ठरलं : पुण्यात विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव प्राधिकरणाकडून येत्या दोन दिवसात राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे. लॉकडाउनच्या काळातच पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. 

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. संपूर्ण मेट्रो मार्ग हा इलेव्हेटेड असणार आहे. हे काम बीओटी तत्त्वावर टाटा- सिमेन्स या कंपनीला देण्यात आले आहे. पीएमआरडीएने हाती घेतलेली मेट्रो पुणे महापालिकेच्या हद्दीत पुणे विद्यापीठ चौकातून गणेशखिंड रस्त्याने जातो. या मार्गावर असलेले तिन्ही उड्डाणपूल हे अडचणीचे ठरत आहे. हे उड्डाणपूल न पाडता मेट्रो मार्गात बदल केला, तर शासकीय आणि खासगी जागा ताब्यात घ्याव्या लागत आहे. त्यातून प्रकल्पाचा खर्च देखील वाढू शकतो. त्याऐवजी हे उड्डाणपूल पाडावेत, असा विचार पुढे आला होता. तीन महिन्यांपूर्वी गणेशखिंड रस्त्यावरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या नवीन कार्यालयाचे उद्‌घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमात या उड्डाणपूलासंदर्भात पवार यांनी वक्तव्य केले होते. 

गेल्या काळात काही चुका झाल्या. त्या शंभर वर्ष तशाच ठेवल्या पाहिजे, असे नाही. तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. या रस्त्यावरील उड्डाणपूल पाडून खाली रस्ता, त्यावर दोन मजली उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन आहे, असे पवार यांनी स्पष्ट केला होते. दोन दिवसांपूर्वी कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पवार यांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यामध्ये हा उड्डाणपूल पाडण्यासंदर्भातील सूचना केल्या होत्या. 

यासंदर्भात पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘उड्डाणपूल पाडण्यास पालकमंत्री अजित पवार यांनी मान्यता देऊन तसा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसात तो राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.’’ 

आता चूक सुधारणार
गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल हे एमएसआरडीसीकडून २००६ मध्ये बांधण्यात आले आहेत. या पुलाच्या उद्‌घाटनप्रसंगी नियोजन चुकल्याची कबुली देण्यात आली होती. एकेरी ऐवजी दुहेरी वाहतुकीसाठी ते उभारणे आवश्‍यक होते, असे तज्ञांचे म्हणणे होते. ही चूक आता मेट्रो प्रकल्पाच्या निमित्ताने सुधारण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT