विनायक मेटे
विनायक मेटे sakal
पुणे

आर्यन खानला वाचविण्यात सरकारला रस ; विनायक मेटे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बीड जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील आत्महत्यांची संख्या त्या पटीत आहे. मात्र राज्य सरकारमधील एकाही मंत्र्याला त्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही. केवळ आर्यन खानला वाचविण्यात त्यांना रस आहे, अशी टीका शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, प्रदेश प्रवक्ता तुषार काकडे, शहराध्यक्ष भरत लगड, बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.

मेटे म्हणाले, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामेदेखील गांभीर्याने होत नाहीत. त्यामुळे केवळ चार ते पाच हजारांची मदत दिली जात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सुटले नाहीत तर दिवाळीनंतर लगेचच बीड जिल्ह्यात शेतकरी मोर्चा काढण्यात येईल.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत वेळोवेळी शब्द देऊनही सरकार चालढकल करत आहे. मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती देणे, अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी पुरवणे आदी गोष्टी होऊ शकलेल्या नाहीत, असेही ते म्हणाले.शिवसंग्रामच्यावतीने पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, किती जागा लढवणार, युती करणार की नाही, याचा निर्णय झाला नसून चर्चा चालू असल्याचे मेटे यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT