Moropant-Pingale
Moropant-Pingale 
पुणे

गोविज्ञानाची चळवळ

मोरेश्‍वर जोशी

मोरोपंत पिंगळे यांच्या ‘गोविज्ञान चळवळी’चा रौप्यमहोत्सव शनिवारी (ता. ७) पुण्यात साजरा होत आहे. त्यानिमित्त गोसेवा पुरस्कारांचे वितरण होत आहे. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहनराव भागवत उपस्थित राहणार आहेत.

दूध देणाऱ्या गाईएवढीच दूध न देणारी गायही तेवढीच महत्त्वाची आहे, हे स्पष्ट करण्यासाठी देशभर गोशाळा आणि प्रयोगशाळा यांचे जाळे उभे करणारे मोरोपंत पिंगळे यांच्या ‘गोविज्ञान चळवळी’चा रौप्यमहोत्सव शनिवारी पुण्यात साजरा होत आहे. त्यानिमित्त या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. 

या वर्षीचा पुरस्कार पश्‍चिम बंगालमधील ‘गोसेवा परिवार’चे ललित अग्रवाल यांना दिला जात आहे. पश्‍चिम बंगालमधील कामाचे वैशिष्ट्य म्हणजे देशी गाईचे दहा किलो शेण आणि दहा लिटर गोमूत्र यांच्या आधारे तयार केलेले खत एका एकराला पुरते, हा प्रयोग गोसेवा परिवाराच्या वतीने तेथील ३३५ गावांत झाला आहे. तेथेही गोविज्ञानाची औषधे शरीरव्याधींना उपयोगी पडली आहेतच; पण त्यामुळे व्यसने सुटू शकतात.

गोविज्ञानाला गती देण्याचे काम मोरोपंत पिंगळे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी केले. गाय शेतीला अतिशय उपयोगी आहे, अशा प्रकारचे अनेक संदर्भ जुन्या ग्रंथांतून दिसतात.

पण, अलीकडच्या काळात त्या ज्ञानाचा उपयोग केला जात नाही. उलट भाकड गाय हा एक प्रश्‍न आहे, असे मानले जाते. पिंगळे यांनी रा. स्व. संघाच्या माध्यमातून प्रयोग करणाऱ्यांची एक टीम उभारली. एक एकर शेतीच्या खतासाठी दहा किलो देशी गाईचे शेण आणि दहा किलो गोमूत्रही पुरते, हे त्यांनी दाखवून दिले. यावर आधारित गोविज्ञान अनुसंधान संस्थेला पाच पेटंट्‌सही मिळाली आहेत.

महाराष्ट्रात दहा किलो शेणात पाव किलो मध मिसळून अमृतपाणी नावाचे खत तयार केले जाते. पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूरपासून उत्तरेला ७० किमी अंतरावर देवळापार येथे जी मध्यवर्ती गोशाळा आणि प्रयोगशाळा उभी केली आहे, त्यांनी देशातील अनेक ठिकाणच्या शेतावर प्रयोग करून हे अमृतपाणी पाच लिटर गोमूत्र आणि पाच किलो शेण यांच्या मदतीने तयार केले आहे. कोणते अमृतपाणी कोणत्या पिकाला कसे उपयोगी पडते, यावर त्यांच्या कार्यशाळाही असतात. हे खत कमी खर्चातही होते. रासायनिक खताला लागणारा खर्च आणि त्यांतून उद्‌भवणाऱ्या समस्या सर्वज्ञात आहेत. या खताचे वैशिष्ट्य म्हणजे ते शेतकऱ्याला आपल्या हाताने व कमी खर्चात करता येते.

पिंगळे यांच्या मार्गदर्शनातून देशात किमात ३०-३५ ठिकाणी अनेक राज्यांत असे काम सुरू झाले आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात गोआधारित शेतीचे ‘मॉडेल शेती प्लॉट’ उभे केले आहेत. दहा गावे दत्तक स्वरूपात घेतली आहेत. दूध न देणारी म्हणजे भाकड गाय यासाठी उपयोगी पडते, हे यात लक्षात आले. जी गावे दत्तक स्वरूपात आहेत, त्यांना दूध न देणाऱ्या गाईच देण्यात आल्या आहेत आणि त्याचा उपयोगही होत आहे. अतिशय कमी खर्चात ही गोआधारित शेती होण्याने अनेक प्रश्‍नांवर उत्तरे सापडतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT