Kasba Bypoll Election 
पुणे

Kasba Bypoll Election : "ब्राह्मण समाजाने विनंती केली म्हणून..." कसब्यात आनंद दवे भरणार अर्ज

सकाळ डिजिटल टीम

Kasba Bypoll Election : कसबा पोटनिवडणुक राज्यात चर्चेत आली आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. याठीकाणी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकारण चांगलच तापलं आहे. 

या कसबा पेठेतून काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर भाजप कडून हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाली. भाजपकडून टिळक कुटुंबात उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी दिली नाही त्यामुळे नाराजीचे वातावरण आहे. 

दरम्यान कसबा पोटनिवडणुकीत कोणत्याही पक्षाने ब्राह्मण समाजाला उमेदवारी न दिल्याने हिंदू महासभेने ही निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी अर्ज भरण्याची घोषणा केली आहे. उद्या (मगंळवार) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे दवे यांनी सांगितले आहे. खुल्या प्रवर्गाचा आवाज विधानसभेत पोहचवण्यासोबतच पुणेश्वराला मुक्त करणे तसेच स्वच्छ, सुंदर कसबा हे आपले ध्येय असल्याचे दवे म्हणाले. 

हिंदू समाजातील सर्व जातींना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. पुणे जिल्ह्यात २१ आमदार असताना प्रत्येक समाजाचे प्रतिनिधित्व असताना ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व का डावलले गेले, असा प्रश्न आनंद दवे यांनी भाजपला केला आहे. ब्राह्मण समाजाची मागणी हिंदू महासभा पर्यंत आल्यानंतर मी स्वत: रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला ही धोक्याची सुचना आहे. हिंदू महासंघाचा उमेदवार इथं निवडून येईल, अशी माझी खात्री असल्याचे दवे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT