पिरचंदसाहेब, महादेव मंदिर sakal
पुणे

Pune : आदर्श गाव भागडीत हिंदू मुस्लिम ऐक्याची शंभर वर्षाची परंपरा. पिरचंद साहेब दर्गा

पिरचंदसाहेबांचा संदल कार्यक्रम नुकताच झाला असून संदल मिरवणुकीचा मान परिसरात राहणाऱ्या मुस्लीम बांधवाना सन्मानपूर्वक निमंत्रण

डी. के वळसे पाटील

मंचर : आदर्शगाव भागडी गावात एकही मुस्लिम कुटुंब राहत नाही. पिरचंदसाहेब, महादेव मंदिर व मारुती मंदिरे शेजारीशेजारी आहेत. दर्गा व दोन्ही मंदिराची दैनंदिन देखभाल दिवाबत्ती हिंदू बांधव श्रद्धेने करत आहेत.

पिरचंदसाहेबांचा संदल कार्यक्रम नुकताच झाला असून संदल मिरवणुकीचा मान परिसरात राहणाऱ्या मुस्लीम बांधवाना सन्मानपूर्वक निमंत्रण देऊन साजरा करण्याची १०० वर्षाची परंपरा आहे. यात्रा उत्सवाच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम ऐक्य पहावयास मिळते.

मुक्ताबाई देवीचा अभिषेक, पूजा, चोळी-पातळ व त्यानंतर पिरचंदसाहेब संदल मिरवणुकीचे सवाद्य आयोजन केले जाते. मिरवणुकीच्या अग्रभागी उद्योजक किसनराव उंडे, प्रभाकर उंडे, सरपंच गोपाळ गवारी, यात्रा समितीचे अध्यक्ष नितीन आगळे, ज्ञानेश्वर उंडे, तबाजी उंडे, दिनकर आदक, विलासराव उंडे, मुरलीधर थिटे,अनिल गवारी, संदीप आदक, होते.

गेली अनेक वर्ष निमगाव सावा, मंगरूळ पारगाव, बेल्हे आदी आजूबाजूच्या गावात राहणाऱ्या मुस्लीम बांधवाना संदल उत्सव साजरा करण्यासाठी निमंत्रित करण्याची परंपरा आहे. पिरमहंमद मोमिन, सादिक मोमीन, पर्वेश मोमीन, लालु मोमिन, शोयद इनामदार यांनी गोड भात तयार करून संदल मिरवणुकीची व्यवस्था पहिली.

आकर्षक रोषणाई, शोभेचे दारूकाम, फटाक्याच्या आतषबाजी, लेझीम- ढोल पथक मिरवणुकीत होते. मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने आले होते. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, किसनराव उंडे व आदर्श गाव गावडेवाडी चे ऋषिकेश गावडे यांच्या हस्ते कृषी भूषण पुरस्कार विजेते बाळासाहेब गवारी,

उच्च शिक्षित एमएड शिक्षक संघ कृती समितीच्या राज्य अध्यक्षपदी राजू सावकार जाधव (सर), उपसरपंच लता विलास उंडे यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पुणे जिल्हा महिला सरचिटणीसपदी निवड, स्वच्छता कामगार आदिनाथ शिंदे यांचा व मुस्लिम बांधवांचा सन्मान करण्यात आला.

“येथील गावकर्यांनी राज्यशासनाच्या आदर्शगाव योजनेअंतर्गत आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्शगाव राळेगण सिद्धी, आदर्शगाव हिवरे बाजार याप्रमाणेच आदर्शगाव भागडी गावाचा कायापालट ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या माध्यमातून केला आहे.

हे गाव पाणीदार झाले माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व भीमाशंकर कारखान्याने ही गावाला वेळोवेळी मदत व सहकार्य केले आहे.येथील हिंदू-मुस्लीम ऐक्य अन्य गावांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारे आहे.”असे देवदत्त निकम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT