पुणे

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे खडकवासला परिसरातील शेकडो हेक्टर वनक्षेत्र धोक्यात

निलेश बोरुडे

किरकटवाडी : खडकवासला गावच्या हद्दीत 'मोरटाका' परिसरात जंगलाला आग लागून शेकडो एकर वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. वणवा नियंत्रणासाठी, प्रतिबंधासाठी वनविभाग गाफील असल्याचे दिसत असल्याने शेकडो हेक्टर वरील वनसंपदा धोक्यात आली आहे.

खडकवासला, डोणजे,नांदोशी- सणसनगर व सिंहगड परिसरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे.दरवर्षी या परिसरामध्ये आग लागून गवत,झुडपे,साग, शिसम,खैर, कडुनिंब,बाभूळ व इतर झाडे जळून जातात. वन्यप्राण्यांचाही अधिवास या आगीमुळे नष्ट होतो. परिणामी मोर,हरिण,चितळ, सांबर,ससा असे जंगली प्राणी व पक्षी या परिसरातून इतरत्र स्थलांतर करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मागील वर्षीही दै. 'सकाळ' च्या माध्यमातून वणवा रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी वनविभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी दिपक पवार यांनी वनवा रोखण्यासाठी 'फायरलाइन' टाकण्यात येतील असे सांगितले होते. परंतु वनविभागाकडून अत्यंत तुरळक ठिकाणी फायरलाइन टाकल्या जात असल्याने या उपाययोजना केवळ कागदावरच राहत आहेत.

प्रतिबंधाशिवाय वनवा नियंत्रीत करणे कठीण- वाळलेली झाडेझुडपे,गवत, पालापाचोळा, डोंगराळ भाग, जवळपास जलस्त्रोतांचा अभाव व वाहणारे वारे अशा अनेक कारणांमुळे एकदा आग लागल्यानंतर आटोक्यात आणणे कठीण होते. त्यामुळे जंगलाला आग लागू नये किंवा आग लागली तरी तेवढ्या परिसरापुरती मर्यादीत राहावी यासाठी वनविभागाने परिणामकारक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

जनावरांचे गोठे,चारा धोक्यात- या परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी शेतकऱ्यांचे जणावराचे गोठे, चाऱ्यांच्या गंजी आहेत. अनेक वेळा वनव्यांमुळे शेतकऱ्यांचे गोठे, चारा जळून खाक झालेला आहे.काही दिवसांपूर्वी खडकवासला येथील शेतकरी सचिन मते यांचे चाऱ्यासह धान्यही जळून गेले. जंगलाला वनवा लागल्यानंतर गोठ्याभोवती रात्रंदिवस थांबून राहावे लागते असे शेतकरी सांगतात.

दरवर्षी असे संपूर्ण जंगल जळून जाते. वनविभाग आग नियंत्रण रेषा टाकण्याकडे लक्ष देताना दिसत नाही. वनसमिती, वनकर्मचारी यांनी अशा आगीच्या घटना रोखण्यासाठी जनजागृतीसह प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठीही वनविभागाने विचार करावा. -विजय कोल्हे, माजी सरपंच, खडकवासला

रात्री उशिरापर्यंत परिसरातील सर्व वनकर्मचारी आग विझवत होते. काही उपद्रवी लोक मुद्दाम जंगलाला आग लावतात. जागृक नागरिकांनी अशा लोकांची माहीती वनविभागाला द्यावी. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. वनविभागाकडून फायरलाइन टाकण्याचे कामही सुरू आहे. -वैशाली हडवळे, वनपाल, खडकवासला

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT