news gun firing 
पुणे

Pune : एअरगन, पिस्तूल बाळगणाऱ्यांना अटक

भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बेकायदेशीररीत्या एअरगन आणि पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना सापळा रचून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन पिस्तूलांसह दोन काडतुसे जप्त केली आहेत. सौरभ रामचंद्र सोळसकर (वय २२, रा. बालाजीनगर), शुभम आबा कसबे (वय २१, रा. कात्रज) व दत्तात्रेय राजाराम पाटोळे (वय १९, रा. कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल केला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील उपनिरीक्षक अंकुश कर्चे व त्यांचे पथक सोमवारी रात्रगस्त घालत होते. पथक पहाटे कात्रज येथील नारायणी धाम मंदिर येथे आले असता त्यांना दुचाकीवर तिघेजण बसल्याचे दिसले.

त्यांना हटकले असता ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांना पकडून चौकशी केली. तसेच, त्यांची झडती घेतली. त्यावेळी सोळसकरकडे एक पिस्तूल व दोन काडतुसे, कसबेकडे एक पिस्तूल व एक काडतूस आणि पाटोळे याच्याकडे काळ्या रंगाची एअरगन व राउंड मिळून आले. त्यांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक संगीता यादव, हर्षल शिंदे, गणेश शेंडे, रवींद्र चिप्पा, राजू वेगरे व तुळशीराम टेंभुर्णी यांच्या पथकाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

Pune Crime : ‘एनएचएम’ मधील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोटयावधींचा गंडा; नोकरीत कायम करण्‍याच्‍या नावाखाली उकळले ७५ कोटी

Pakistan admits: मोठी बातमी! अखेर पाकिस्तानला कबूल करावंच लागलं ; 'अमेरिकेच्या मध्यस्थीसाठी कधीच तयार नव्हता भारत'

SCROLL FOR NEXT