नेपाळला भारताकडून मदत सुरूच
नवी दिल्ली : पूरग्रस्त नेपाळच्या मदतीसाठी भारताने आणखी ३७.५ टन मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) साहित्य पाठविल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी समाजमाध्यमावर दिली. औषधे, अन्नाची पाकिटे आणि एचएडीआर साहित्य घेऊन दुसरे विमान नुकतेच रवाना झाले, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. नेपाळच्या अधिकाऱ्यांशी भारताचा सातत्याने संपर्क असून, मदतकार्याला भारताकडून पाठिंबा सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तिबेट सीमेलगतच्या भागात आलेल्या भीषण अचानक पुरामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान १६० जणांचा मृत्यू झाला असून, मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी संवाद साधून सर्वतोपरी मानवतावादी मदत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर काही तासांतच भारताने मदतीची पहिली खेप पाठविली होती. या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बंधू-भगिनींसोबत आहे, असे मोदी यांनी म्हटले होते. पहिल्या टप्प्यात तात्पुरते निवारे, ब्लँकेट, स्वच्छता किट, सौर दिवे आणि औषधांसह अत्यावश्यक साहित्य पाठविण्यात आले. येत्या काही दिवसांत भारताकडून आणखी मदत पाठविली जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.