Industries should take initiative for youth employment Governor Ramesh Bais
Industries should take initiative for youth employment Governor Ramesh Bais sakal
पुणे

Governor Ramesh Bais : युवकांच्या रोजगारासाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा - राज्यपाल रमेश बैस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील युवकांना कौशल्ययुक्त करण्यासाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (ता.९) पुण्यातील उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना केले. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीत (यशदा) आज राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘इंडस्ट्री मीट’चे (उद्योग बैठक) आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत बोलताना त्यांनी हे आवाहन केले.कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने 'कौशल्य केंद्र आपल्या दारी' या संकल्पनेवर आधारित ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पुणे विभागातील उद्योग, उद्योग संघटना, प्लेसमेंट एजन्सीज व मोठे कामगार कंत्राटदार आदी सहभागी झाले होते.

या बैठकीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, या विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त डॉ. रामास्वामी एन., महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर,

सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, हनिवेल ऑटोमेशनचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, 'एमसीसीआयए'चे महासंचालक प्रशांत गिरबाने, 'सीआयआय'चे कार्यकारी संचालक सौगत राय चौधरी, यशप्रभा ग्रुपचे संचालक अमित घैसास आदी उपस्थित होते.

बैस पुढे म्हणाले, ‘‘प्रगत देशात कुशल कामगारांची मोठी आवश्यकता आहे. युवकांना छोट्या कौशल्याचे प्रशिक्षण दिल्यास ते मोठ्या प्रमाणात रोजगारक्षम होतील. त्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना उद्योगांची साथ आवश्यक आहे. त्यासाठी हे युवक कौशल्ययुक्त होणे आवश्यक आहे.’’

राज्य सरकार युवकांच्या कौशल्य विकासासाठी उद्योगांना सहभागी करेल. यानुसार राज्यातील विविध उद्योगांच्या ठिकाणी १०० कौशल्य केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. शिवाय ग्रामीण भागांत गावांमध्ये ५०० कौशल्य केंद्र स्थापन करण्यासाठी निविदा काढल्या आहेत.

यासाठी उद्योगांनी पुढे यावे, अशी अपेक्षा मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केली. मनीषा वर्मा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राज्यपाल बैस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या ‘फिनिशर प्लॅटफॉर्म’चे उद्घाटन करण्यात आले.

‘राज्यात १४१ सामंजस्य करार’

राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरातील विविध उद्योगांसमवेत मिळून १४१ सामंजस्य करार (एमओयू) करण्यात येत आहेत. या सामंजस्य करारांमुळे राज्यातील किमान १ लाख युवकांना रोजगार मिळणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT