पुणे - जम्मू- काश्‍मीरमध्ये संपर्क यंत्रणा बंद असल्याने कुटुंबीयांशी संवाद होत नसल्याची व्यथा मांडताना काश्‍मिरी विद्यार्थी. 
पुणे

पुण्यात शिकणाऱ्या काश्‍मिरी विद्यार्थ्यांना कुटुंबीयांची वाटतेय काळजी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जम्मू- काश्‍मीरमध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर संपर्काची साधने बंद आहेत. एकमेकांशी संवाद बंद झाल्यामुळे पुण्यात शिक्षण घेणाऱ्या तरुणांचे त्यांच्या कुटुंबीयांशी बोलणेही होत नाही. केंद्र सरकारने आता तरी तेथील संपर्क व्यवस्था खुली करावी, ज्यामुळे घरचे लोक सुरक्षित आहेत का, हे आम्हाला समजेल, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.  

जम्मू- काश्‍मीरच्या विविध भागांतील विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेत आहेत. यातील कात्रज येथील सरहद संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, काश्‍मीरमध्ये संपर्क यंत्रणा बंद असल्याने कुटुंबीयांची काळजी वाटत आहे,  अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ना आम्ही त्यांच्याशी बोलू शकतो, ना ते आम्हाला फोन करू शकतात, असेही त्यांनी सांगितले. 

अदिल मलिक हा बारामुल्ला जिल्ह्यातील आहे. तो म्हणाला, ‘‘अचानक घटना घडत गेल्याने लोक धास्तावलेले आहे. लोकांना फिरण्याचे स्वातंत्र्य द्या. संपर्क यंत्रणा ठप्प आहेत. मी दोन दिवसांपूर्वी येथे आलो. आता घरच्यांना फोन करू शकत नाही. मी पोचलो आहे, हेदेखील त्यांना माहीत नाही.’’ जाहीद भट म्हणाला, ‘‘पाच ऑगस्टला मी पुण्याला यायला निघालो. त्या दिवशी रस्त्यात अनेक चेकपोस्टवर तपासणी झाली. तेव्हापासून काश्‍मीरची योग्य माहिती मिळत नाहीये.’’

मूळचा बडगाम येथील फिरदौस मीर पुण्यात बीएच्या तिसऱ्या वर्षाला आहे. तो म्हणतो, ‘‘आज वीस दिवस झाले, घरच्यांशी बोललो नाही. घराच्या आजूबाजूला प्रचंड सुरक्षा आहे. मित्र परिवार एकमेकांच्या घरी जाऊ शकत नाही. अनुचित काही घडेल म्हणून लोक धास्तावले आहेत.’’

पाच ऑगस्टपासून घरच्यांबरोबर संपर्क नाही. तिथे सैन्य येत असल्याने घरच्यांनी घाबरून मला परत बोलावले होते. सरकारने संपर्क यंत्रणा खुली केली पाहिजे, ज्यामुळे त्यांच्याशी बोलता येईल.
- नझीर

आता फक्त काय होणार याचाच विचार आम्ही सर्वजण करतो आहोत. एकमेकांना दिलासा व आधार देत आम्ही येथे राहात आहोत. येथील मित्रही मदत करत आहेत.
- मुश्‍ताक अहमद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT