Kumar Saptarshee speaks at rajarambapu patil birth anniversary program  
पुणे

जे प्रश्न विचारतात त्यांना देशद्रोही ठरवले जाते : कुमार सप्तर्षी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'समाजात प्रश्न विचारणारे आवडत नाही. विचारले तर त्यांना देशद्रोही ठरवले जाते, असा काळात राजारामबापू पाटील यांच्यासारख्या नेत्यांची गरज समाजाला आहे,' असे प्रतिपादन युकांतचे नेते कुमार सप्तर्षी यांनी शुक्रवारी केले. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते सप्तषी बोलत होते.

यावेळी माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे, माजी मंत्री अण्णा डांगे,जलसंपदा मंत्री जयंत पाटील,भू माजी आमदार शरद पाटील, कुमार सप्तषी, दिलीप पाटील, नाथाभाऊ शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी पाठविलेला संदेश शरद पाटील यांनी वाचून दाखविला.

यावेळी ढाकणे म्हणाले, 'आज बापू असते, तर त्यांनी एनसीआर व सीएएच्या कायद्याला जोरदार विरोध केला असता. त्याविरोधात देशाभर मोर्चा काढले असते. आज देशात वातावरण गढूळ करण्याचे काम सुरू आहे.' देशात आज एकाच मंत्र शिल्लक आहे, तो म्हणजे नमो..नमायहे चांगले लक्षण नाही, असे सांगून सप्तषी म्हणाले, 'जात एक विशिष्ट दुष्टी देते. पण तुमचे कर्म तुम्हाला नवीन दुष्टी देते. राजारामबापूंचा कर्मावर विश्वास होता. त्यामुळे ते कर्मवीर होते. समाजात प्रश्न विचारणारे कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत. कारण तो समाजाचा हुंकार असतो.'

यावेळी अण्णा ढाकणे यांचे भाषण झाले. नाथाभाऊ शेवाळे यांनी स्वागत केले. दिलीप पाटील यांनी प्रस्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilanga Municipal Election : आपल्याच पक्षाच्या उमेवाराला मतदान करून घेण्यासाठी रस्सीखेच; “निलंगा नगरपालिकेत चुरशीची लढत!

Agriculture News : कमी पाण्यात भरघोस उत्पन्न! मका-ज्वारीऐवजी जळगावच्या शेतकऱ्यांची हरभऱ्याला पसंती

Ichakaranji Election : धूळ खात पडलेल्या पोलिस चौक्या पुन्हा कार्यरत; निवडणूक काळात इचलकरंजीत कडेकोट बंदोबस्त

T20 World Cup 2026 : लकी चार्म...! भारत टी-२० वर्ल्ड कप जिंकणार, कारण संघात 'तो' खेळाडू परतला; २०२४ चा वर्ल्ड कप जरा आठवा...

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये सत्तेचे नवीन समीकरण! शहरात भाजपला, तर ग्रामीण भागात राष्ट्रवादीला झुकते माप

SCROLL FOR NEXT