पुणे

राज्यातील धरणांत ३४ टक्के पाणीसाठा

CD

पुणे, ता. १९ : राज्यातील सर्व विभागांतील सुमारे तीन हजारांहून अधिक धरणांमध्ये सध्या केवळ सुमारे ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये सर्वाधिक पाणीसाठा म्हणजे ४४.३९ टक्के अमरावती विभागात असून, सर्वांत कमी पाणीसाठा म्हणजे २५.२६ टक्के पुणे विभागात आहे. मागील वर्षीपेक्षा पाणीसाठा समाधानकारक असला, तरी पाणी जपून वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

राज्यातील नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण विभाग मिळून एकूण तीन हजार २८ मोठे, मध्यम व लघु प्रकल्प आहेत. त्यातही सर्वात जास्त प्रकल्प छत्रपती संभाजीनगर विभागात असून, त्यांची संख्या ९२९ आहे. सर्वांत कमी प्रकल्प कोकण विभागात असून, त्यांची संख्या १७३ एवढी आहे. कडक उन्हाळ्यामुळे मार्च महिन्यापासूनच धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच, सिंचन आणि पिण्यासाठीही पाण्याचा वापर वाढल्याने उपसाही वाढला आहे. परिणामी, धरणांमधील पाण्याची पातळी सरासरीपेक्षा खूपच खालावली आहे. पाण्याचा वापर जपून करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने केल्या आहेत.

विभागानिहाय पाणीसाठा (टक्क्यांत)
विभाग--- आजचा --- मागील वर्षीचा
नागपूर ---४२.६६ --- ३३.०४
अमरावती ---४४.३९---३९.३८
संभाजीनगर ---३८.३८--२८
नाशिक --- ३४.६०--- ३१.३६
पुणे --- २५.२६---- २२.२९
कोकण ---- ३७.७६--३८.२५
एकूण ---- ३३.९५--२८.९६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: तृणमूल काँग्रेसच्या महिला खासदाराला केंद्र सरकारने दिली वाय दर्जाची सुरक्षा; नेमकं काय घडलं?

Mumbai News: 'त्या' आवश्यक जागांवर सोसायटीचाच अधिकार, उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

पहिल्या पावसात खुलणार समर आणि स्वानंदीचं प्रेम! 'वीण दोघातली ही तुटेना'चा जबरदस्त प्रोमो समोर, नेटकरी म्हणतात, 'समरराव...'

मालवाहू जहाजांना फटका! 'जेएनपीए'त अडकले एक लाखाहून अधिक कंटेनर

Buldhana News: जिल्ह्यात २० गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट कामांना मंजुरी; पाणीटंचाई निवारणः १२७ उपाययोजनांना मिळाली प्रशासकीय मान्यता

SCROLL FOR NEXT