Mahatma Phule Mandai in pune
Mahatma Phule Mandai in pune 
पुणे

पाणी पाहिजे पाणीsss : मंडईतील व्यापारी त्रासले!

महेश जगताप

पुणे : शुक्रवार पेठेतील महात्मा फुले मंडईला पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहकांची गैरसोय होत आहे. तसेच, स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे.

फुले मंडई ही शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने मोठी वर्दळ असते. मंडईत जवळपास एक हजार सहाशे व्यापारी गाळे आहेत, तर एक हजार व्यापारी आहेत. पहाटे सहा वाजल्यापासून मंडईत ग्राहकांची वर्दळ सुरू होते ती रात्री नऊ वाजेपर्यंत असते. किरकोळ व्यापार येथे होत असल्याने शहरातील पेठा आणि लगतच्या भागातील ग्राहक येथे येतात; मात्र या मंडईला सध्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. मागणीच्या तुलनेत होणारा पाण्याचा पुरवठा कित्येक पटीने कमी असल्याने व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होते. 

एवढ्या मोठ्या मंडई फक्त तीन पाण्याचे नळ आहेत आणि त्यांना फक्त अर्धा ते पाऊण तास पाणी असते. कधी कधी तर पाणी येत नाही. त्यामुळे व्यापारी वर्गाला विकत पाणी घ्यावे लागते; मात्र छोट्या भाजी विक्रेत्यांना ते परवडत नाही. त्यामुळे त्यांना इतरत्र भटकावे लागते. मंडईत महिला जास्त असल्याने त्यांना त्याचा अधिक त्रास होतो. भाज्या ताज्या ठेवण्यासाठी पाणी मारावे लागते. पाण्याअभावी भाजी ताजी राहत नाही. त्यामुळे त्यातून मोठे नुकसान होत आहे.

त्याचबरोबर पाण्याअभावी स्वच्छतागृहातदेखील घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी करूनही त्याला दुर्लक्षित केले जाते, अशी खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

याबाबत मंडईचे प्रशासन प्रमुख बाळासाहेब भोसले यांच्याशी संपर्क साधला असता, मी लवकरात लवकर चौकशी करून पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन, असे त्यांनी सांगितले.

मंडई भागात वेळेवर पाणी सोडले जाते. पाणी सोडण्याची वेळ सकाळी ५ ते ९ आहे. त्यामुळे आम्ही दिवसभर पाणी सोडू शकत नाही. या ठिकाणी जास्त साठवण क्षमतेच्या टाक्‍या उभारल्या पाहिजेत, तरच व्यापाऱ्यांना दिवसभर पाणी उपलब्ध होईल. 
- राजेंद्र खैरनार, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

मी वेळोवेळी प्रशासनाकडे पाण्याची मागणी केली. गेल्या काही वर्षांपासून फक्त एका नळाला पाऊण तास पाणी सोडले जाते. लवकर आणखी काही नळ उपलब्ध करून दिवसभर पाण्याची सोय करावी.
- राजाभाऊ कासुर्डे, अध्यक्ष, व्यापारी संघटना, महात्मा फुले मंडई

भाजीपाल्यासाठी पाणी आवश्‍यक असते. मात्र ते मिळत नाही. त्याचा व्यवसायावर परिणाम होतो. त्याचबरोबर पाण्याअभावी स्वच्छतागृहाचीही अवस्था फार वाईट आहे.
- कांचन कोळपकर-दोडे, व्यापारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT