Valchandnagar
Valchandnagar 
पुणे

विद्यार्थ्यांच्या अडचणीसाठी थेट शिक्षणमंत्री विनोद तावडेंना फोन

राजकुमार थोरात

वालचंदनगर : येथून शाळेमधून सुटलेल्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी एसटी बस मिळत नसल्याने येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष संतोष भिसे यांनी थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना फोन करुन तक्रारीचा पाढा वाचला. तावडे यांनीही विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी संबधित विभागाला आदेश देणार असल्याचे सांगितले. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर व कळंब परीसर हा शैक्षणिक हब म्हणून ओळखला जातो. या परीसरामध्ये एक महाविद्यालय, चार विद्यालये, चार प्राथमिक शाळा असून सुमारे दहा हजार विद्यार्थी शिक्षणणाचे धडे गिरवत आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी हे बाहेरगावचे असून बारामती, इंदापूर, माळशिरस तालुक्यातून एटी.बसने येत असतात. 

दिवाळीच्या सुट्टीनंतर एस. टी. महामंडळाच्या बारामती, इंदापूर व अकलूज आगाराने एसटी बसची संख्या कमी केली असल्याने एसटीच्या फेऱ्या कमी झाल्या असून विद्यार्थी जास्त व बस कमी झाल्या आहेत. बसमध्ये विद्यार्थ्यांना जागा मिळत नाही. तसेच अनेक चालक, वाहक विद्यार्थ्यांना बसमध्ये घेत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी शाळेमध्ये येण्यासाठी व घरी जाण्यासाठी उशीर होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत आहे. सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर रात्री साडेसात वाजेपर्यंत वाजेपर्यंत बसस्थानकामध्ये बस येण्याची प्रतिक्षा करावी लागत असून सायंकाळी सातनंतर अंधार व थंडीचा विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सोमवार (ता. १८) रोजी रात्री सात वाजेपर्यंत निरवांगी, निमसाखर, मानेवस्ती परीसरातील मुले व मुली एसटीच्या प्रतिक्षेमध्ये होती. मनसेचे अध्यक्ष संतोष भिसे, प्रदीप रकटे बसस्थानकजवळू जात असताना त्यांनी विद्यार्थी थांबल्याचे पाहिले. यावेळी वर्धमान विद्यालयातील पंकज पाटील, शिवप्रसाद कुलकर्णी हे दोन शिक्षक ही विद्यार्थ्यांना बसमध्ये बसविण्यासाठी आले होते. भिसे यांनी चौकशी करुन बारामती, इंदापूर व अकलूज आगाराच्या प्रमुखांना फोन करुन माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्याने शेवटी शिक्षणमंत्री तावडे यांनी फोनवरुन तक्रारीचा पाढा वाचला. तावडे यांनीही तातडीने संबधित विभागाला यामध्ये लक्ष घालून अडचण सोडविणार असल्याचे सांगितले. रात्री साडेसात वाजेपर्यंत बस न आल्यामुळे शिक्षकांनी पालकांना फोन करुन मुले घेवून जाण्यास सांगितले. रात्री आठच्या सुमारास पालक मुले घेवून घरी गेली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT