File photo 
पुणे

पुण्यातील शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोला हिरवा कंदिल

योगिराज प्रभुणे

पुणे, ता ७ : पुणे महानगर क्षेत्र विकास प्रधिकरणाच्या (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोला केंद्र सरकारने अखेर सोमवारी हिरवा कंदील दाखविला.

ही मेट्रो सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) होणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सकाळ शी बोलताना दिली. 

ते म्हणाले, “आठ वर्षांनंतर देशात पीपीपी तत्त्वावर मेट्रो प्रकल्प करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी पीएमआरडीए आणि संबंधित कंपनीमध्ये करारनामा झाला आहे. त्या करारनाम्याला केंद्राने मान्यता दिली असून या प्रकल्पासाठी १३०० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, हा मेट्रो मार्ग करारनाम्याच्या मसुद्यामध्येच अडकल्याचे वृत्त  'सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. या मसुद्याला केंद्र सरकारकडून मान्यता मिळत नसल्याने निविदा काढूनही मेट्रो प्रकल्पाचे काम पुढे सरकत नव्हते.

दरम्यान, पुणे शहरामध्ये सध्या मेट्रोच्या पहिल्या मार्गाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. कोथरुडमधील वनाजपासून रामवाडीपर्यंत या मेट्रोचा मार्ग असणार आहे.

कुणाचा किती वाटा?  
मेट्रो प्रकल्पासाठी एकूण अपेक्षित खर्च ८,००० कोटी रुपये
राज्य सरकारने मंजूर केलेला निधी ८१२ कोटी रुपये
केंद्र सरकारकडून अपेक्षित निधी १,३०० कोटी रुपये
उर्वरित खर्च संबंधित ठेकेदार कंपनी करणार  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: 'मी तुम्हाला बोलावलंच नाहीये...' जेव्हा जसप्रीत बुमराहची सटकते; विमानतळाबाहेर रिपोर्टर्सवर भडकला

Pune : लालपरीची काय ही अवस्था? दरवाजाच नाही, तरी प्रवाशांच्या सेवेत; जीव धोक्यात घालून प्रवास

Latest Marathi News Live Update : नागपूर रेल्वे स्थानक परिसरात शिवसेनेचा मोर्चा

Solapur: ७६ वर्षांनंतर सीनानदी धोक्याच्या पातळीवर; १९४९ नंतरचा सर्वात मोठा पूर, पातळी ४३०.६ मीटरवर

'तिला थंडी ताप आला त्याचं वेळी जर...' आईच्या आठवणीत तेजस्विनीला भावूक होऊन म्हणाली...'आयुष्याचा काही नेम नाही..'

SCROLL FOR NEXT