पुणे

उद्योगनगरीत होणार पाचपट पाणी महाग 

ज्ञानेश्वर बिजले

पिंपरी - देशातील प्रमुख शहरांत सर्वांत कमी पाणीपट्टी आकारणाऱ्या पिंपरी- चिंचवड महापालिकेने सोमवारी (ता. 20) सर्वसाधारण सभेत दरवाढीचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर देशात सर्वाधिक पाणीपट्टी आकारणारी ठरणार आहे. स्थायी समितीचा प्रस्ताव आहे तसा मान्य झाल्यास सध्याच्या पाणीपट्टीच्या तुलनेत चौपट ते पाचपट वाढ होईल. 

मीटर असलेल्या प्रत्येक कुटुंबाला सहा हजार लिटर पाणी मोफत देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्‍क्‍यांऐवजी पाच टक्के वाढ करण्याचे ठरविले. मात्र, पाणी मीटर असलेल्या सर्वांना दरमहा कमीत कमी दोनशे रुपये पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे, 22 हजार पाचशे लिटरपर्यंत पाणी घेणाऱ्यांना दोनशे रुपये द्यावेच लागतील. महापालिकेकडून कमी पाणीपुरवठा झाला तरी, किमान पाणीपट्टी आकारली जाईल. साडेबावीस हजार लिटर पाणी म्हणजे पाच जणांच्या कुटुंबाला प्रतिव्यक्ती दररोज दीडशे लिटर पाणी मिळेल. 

महापालिका सध्या दररोज सुमारे 500 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पुरविते. ते पाणी सर्वसाधारणपणे प्रतिव्यक्ती दोनशे लिटर आहे. महापालिका जास्त पाणी वापरते, असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. प्रतिव्यक्ती 135 लिटर पाणी वापरण्याची त्यांची सूचना आहे. ते लक्षात घेऊन पाणी वापर काटकसरीने करावा लागणार आहे. शहराच्या बऱ्याच भागात सध्या कमी पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही भागात पुरेसे पाणी मिळते. मात्र, दरवाढ मान्य झाल्यानंतर, या कुटुंबांनी रोज 750 लिटरऐवजी सध्याप्रमाणे एक हजार लिटर पाणी वापरल्यास, त्यांना जादा अडीचशे लिटरसाठी दहापट दर म्हणजे प्रती एक हजार लिटरसाठी अडीच रुपयांऐवजी 25 रुपये आकारण्यात येतील. त्यापेक्षा जास्त म्हणजे प्रतिकुटुंबांना दररोज एक हजारपेक्षा जास्त पाणी वापरल्यास त्यांना सध्याच्या व्यापारी दराप्रमाणे म्हणजे 35 रुपयांनी पाणीपट्टी भरावी लागेल. 

पाणीपट्टी वाढीची कारणे 
पाणीपुरवठा विभागाचा वार्षिक खर्च 109 कोटी रुपये आहे. मात्र, पाणीपट्टीची वसुली 31 कोटी रुपयांच्या आसपास आहे. या विभागाने त्यांचा खर्च वसूल करावा, त्यासाठी पाणीपट्टीची रक्कम वाढविण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला. महापालिकेची आर्थिक बाजू पाहिल्यास, काल 5235 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. त्या तुलनेत पाणीपुरवठा विभागाचा खर्च दोन टक्के आहे. त्यापैकी, या आर्थिक वर्षांत पाणीपट्टीपोटी कालपर्यंत 26 कोटी रुपये वसूल झाले. मार्चअखेरपर्यंत 30 कोटी रुपये वसुली अपेक्षित आहे. या बरोबरच पाणीपुरवठा लाभ करापोटी आजपर्यंत 25 कोटी रुपये जमा झाले आहेत. हे दोन्ही कर लक्षात घेता, या विभागाचा खर्चाचा बोजा 50 कोटींपर्यंत महापालिकेवर पडतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे बंधुंच्या युतीचा मुहूर्त ठरला? 'या' तारखेला अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, राज ठाकरे-संजय राऊतांच्या बैठकीत काय झाली चर्चा?

मुलाला वाचवायला रक्ताचे नमुने बदलले, बाप दीड वर्षांपासून तुरुंगात; पोर्शे अपघात प्रकरणी हायकोर्टानं जामीन फेटाळला

IPL 2026 Auction live : CSK ने स्वतःच्याच खेळाडूला 'परकं' केलं! MS DHONI चा विश्वासू गोलंदाज १८ कोटींत KKR च्या ताफ्यात

Credit Card : या सोप्या सवयी लक्षात ठेवल्या, तर क्रेडिट कार्ड देईल तुम्हाला मोठा फायदा! फायदा हवा? हे एकदा नक्की पाहा!

IPL 2026 Auction live : मुंबई इंडियन्सची स्वस्तात मस्त डील! रोहित शर्माला तगडा ओपनिंग पार्टनर मिळाला, झाली घरवापसी; चिंता मिटली

SCROLL FOR NEXT