पुणे - चांगला स्वयंपाक करता येत नाही, नीट भांडी घासत नाहीस, असे सातत्याने टोमणे मारल्याने. तसेच सासरच्या शारिरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.२९) येरवडा भागात घडली.
अश्विनी बाळू पवार (वय २२, रा. नागपूर चाळ, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पती, सासू, सासरे, दीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अश्विनी यांची आई सुनंदा पवार (वय ४७) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनीला स्वयंपाक नीट जमत नाही, तसेच ती नीट भांडी घासत नसल्याचे टोमणे पती, सासू, सासरे, दीर मारत होते. सासरी तिचा शारिरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. टोमणे मारण्यात आल्याने, तसेच शारिरिक आणि मानसिक छळ केल्याने अश्विनी यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक अशोक काटे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.