Maratha-Reservation 
पुणे

Maratha Kranti Morcha: तरुणाईचा जोर

सकाळवृत्तसेवा

पुणे, ता. ९ ः आरक्षणासाठी मराठा समाजाने गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यामध्ये तरुण आणि तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. या तरुण-तरुणींनी ‘सकाळ’शी साधलेला संवाद...

मराठा समाजाने ५८ मूक मोर्चे काढले; पण सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्हाला पुन्हा आंदोलने करावे लागत आहे. आज प्रत्येक क्षेत्रांत मराठा समाज पिछाडीवर जात आहे. शिक्षण आणि नोकरी यामध्ये मराठा समाजाच्या मुलांना डावलले जात आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षण हवे आहे.
- रोहित वावळ 

मी आंदोलनात सहभागी होण्याचे कारण म्हणजे आमच्याकडे पात्रता असूनही आम्हाला प्रत्येक ठिकाणी डावलले जात आहे. मराठा समाजातील मुलांना ९० टक्के गुण असले, तरी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. त्याचबरोबर शिक्षणासाठी प्रचंड प्रमाणात फी भरावी लागते. 
- आदिती सणस 

मराठा समाजातील मुलांना शिक्षणासाठी अनेक समस्या येत आहेत. त्यामध्ये शिक्षणात राखीव जागा नसणे, शिक्षणासाठी प्रचंड प्रमाणात पैसे भरावे लागणे आणि गुणवत्ता असूनदेखील प्रवेश नाकारणे. तसेच सरकारी नोकरीमध्ये मराठा समाजाला डावलले जात आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षण हवे आहे.
- मानसी भुरुक 

आंदोलनात सहभागी होण्याचा उद्देश हा आम्हाला आरक्षण मिळावा, हा आहे. मराठा तरुण हे आज शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मागे पडत आहेत. या तरुणांना पात्रता असूनदेखील शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी प्रवेश नाकारण्यात येत आहे. 
- पूजा चोरगे 

आम्हाला शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण गरजेचे आहे. सामान्य कुटुंबातील विद्यार्थी इंजिनिअरिंगसाठी किंवा मेडिकलसाठी पात्र असूनदेखील केवळ पैशामुळे प्रवेश घेऊ शकत नाही. तसेच, सरकारी नोकरीमध्ये आरक्षण नसल्याने आम्ही पात्र असूनदेखील आम्हाला नाकारले जात आहे. 
- रोहित पवार 

 मराठा समाजाचे ५८ मोर्चे होऊनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे हे मार्चे पुन्हा निघत आहेत. सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. तसेच, ज्या तरुणांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्या घरच्यांना ५० लाख रुपयांची मदत करावी. 
- कर्ण सोनवणे 

सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांस फीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. मात्र, एकही महाविद्यालय विद्यार्थ्यांना सवलत देत नाही. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज देण्याची घोषणा केली होती. मात्र, बॅंका कर्ज देत नाहीत. त्यामुळे शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना अवघड झाले आहे.
- प्रसाद वाघमारे 

समाजातील उच्च शिक्षित तरुण रस्त्यावर उतरत आहेत. याची तरी सरकारने दखल घ्यावी. आंदोलन थांबविण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. 
- मनोज गायकवाड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

SCROLL FOR NEXT