State-Government
State-Government 
पुणे

‘एमआयडीसी’ला करवसुलीचे अधिकार

गजेंद्र बडे

पुणे - राज्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यक्षेत्रात येत असलेल्या ग्रामपंचायतींचे घरपट्टी, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करवसुलीचे अधिकार काढून घेण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. यानुसार ग्रामपंचायतींऐवजी एमआयडीसीला हा अधिकार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. 

ग्रामपंचायत कायद्यातील दुरुस्ती विधेयकाचा कच्चा मसुदा तयार करण्यात आला आहे. त्याला ‘महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम सुधारणा विधेयक :२०१९’ असे नाव देण्यात आले आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने याबाबतची अधिसूचना १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रसिद्ध केली होती. या अधिसूचनेनुसार ग्रामपंचायत करवसुलीच्या नवीन नियमांबाबतचा कच्चा मसुदा तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या नव्या मसुद्यात एमआयडीसीच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींकडे असलेले करवसुलीचे अधिकार काढून घेऊन ते एमआयडीसीकडे देण्यात येणार असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. 

या विधेयकामुळे एमआयडीसी क्षेत्रातील ग्रामपंचायती, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामसभा, पंचायत समिती आणि प्रसंगी जिल्हा परिषदेचेही करवसुलीबाबतचे अधिकार संपुष्टात येणार आहेत. या नव्या नियमात एमआयडीसीने करवसुली करावी. त्यानंतर वसूल झालेल्या एकूण करातील निम्मी रक्कम गावांच्या विकासासाठी वापरावी आणि उर्वरित निम्मी रक्कम प्रशासकीय खर्चासाठी एमआयडीसीने वापरावी, अशी तरतूद आहे. बारामती, इंदापूर, शिरूर, खेड, हवेली आणि मावळ तालुक्‍यांत एमआयडीसीचे क्षेत्र आहे. हे विधायक मंजूर झाल्यास ग्रामपंचायतीच्या अधिकारांवर गदा येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT