congress
congress 
पुणे

रिलायन्सवर गुन्हा दाखल करण्याची या काॅंग्रेस आमदाराची मागणी

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर (पुणे) : ""पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम जून 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि "रिलायन्स इन्फ्रा'ने पाळलेले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी "एनएचएआय' आणि "रिलायन्स इन्फ्रा'वर गुन्हा दाखल करावा,'' अशी मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी केली आहे. 

आमदार थोपटे यांनी शनिवारी "रिलायन्स इन्फ्रा'च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. भोर पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, "रिलायन्स इन्फ्रा'चे सहव्यवस्थापक बी. के. सिंग आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी थोपटे म्हणाले, "जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत "एनएचएआय' आणि "रिलायन्स इन्फ्रा' यांनी जून 2019 पर्यंत पुणे-सातारा रस्त्याचे काम पूर्ण करू, असे लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, ही मुदत संपून चार महिने उलटले, तरी अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. अशा प्रकारे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे "एनएचएआय' आणि "रिलायन्स इन्फ्रा'वर जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहोत.'' 

""पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाबाबत "एनएचएआय'ला पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यास सांगितले आहे. या बैठकीत जून 2019 पर्यंत पुणे-सातारा रस्त्याचे रुंदीकरण का पूर्ण झाले नाही, याचे उत्तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या या बैठकीनंतर आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा ठरवू,'' असेही थोपटे म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT