Aditya Thackeray  Sakal
पुणे

Aditya Thackeray : नागरिकांचे झालेले नुकसान भरून निघेल का? आदित्य ठाकरे यांचा सरकारला प्रश्न

25 जुलै रोजी एकता नगरी परिसरात आलेल्या पूर परिस्थितीची पाहणी आदित्य ठाकरे यांनी केली.

सकाळ वृत्तसेवा

सिंहगड रस्ता - नागरिकांना सांगितलं त्यापेक्षा जास्त पाणी धरणातून सोडण्यात आले आहे. त्यानंतर लगेचच वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तळमजला, पहिला मजला पाण्यात गेला, त्यामुळे नागरिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे झाले; मात्र यातून नागरिकांचे झालेले नुकसान भरून निघेल का? नागरिकांना कायमस्वरूपी उपाययोजना मिळालीच पाहिजे, असे मत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

25 जुलै रोजी एकता नगरी परिसरात आलेल्या पूर परिस्थितीची पाहणी आदित्य ठाकरे यांनी केली त्यावेळी ते बोलत होते. नदी सुधार प्रकल्प अंतर्गत सुरू असलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. तरीही हे काम करण्यात आले. गुजरात मधील नद्या वेगळ्या आहेत तर महाराष्ट्रातील नव्या वेगळ्या आहेत. इथल्या नद्यांचा अभ्यास करून काम करणे अपेक्षित होते.

पुणे महापालिकेत अद्यापही नगरसेवक नाही. निवडणुका झाल्या नाहीत. राडारोडा टाकला जातो त्यावर कोणाचेही अंकुश नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी संरक्षित भिंत बांधण्याचा प्रस्ताव आहे मात्र ती मंजूर कधी होणार त्याला पुरेसा निधी उपलब्ध होणार का? नेमक्या कशा करणार आहेत याबाबत अद्यापही कोणतीही स्पष्टता मिळाली नाही.

व्यवसायिकांसाठी पूररेषा बदलली आहे चुकीचे निकष बऱ्याच ठिकाणी लावले गेले आहेत या सगळ्याची आधी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. आदित्य ठाकरे यांनी परिसरातील सोसायटीच्या नागरिकांची भेट घेतली. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे सर्व पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT