Farmer
Farmer sakal
पुणे

Narayangav News : कुकडी डावा कालव्यात उन्हाळी दुसरे आवर्तन सोडल्यास जलसमाधी घेण्याचा शेतकरी संघटनेचा इशारा

रवींद्र पाटे

पिंपळगाव जोगे धरणातील मृतसाठ्याचा वापर करून २२ मे २०२३ पासून येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय कुकडी पाटबंधारे विभागाने घेतला आहे.

नारायणगाव - कुकडी प्रकल्पाची पाणी पातळी खालावली आहे. पिंपळगाव जोगे धरणातील मृतसाठ्याचा वापर करून २२ मे २०२३ पासून येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय कुकडी पाटबंधारे विभागाने घेतला आहे. या निर्णयाला शेतकरी संघटनेचा व तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.

बेकायदेशीर रीत्या २२ मे रोजी कुकडी डावा कालव्यात पाणी सोडल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने येडगाव धरण जलाशयात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जलसमाधी घेतील. असा इशारा महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे संघटक अंबादास हांडे, तालुका अध्यक्ष संजय भुजबळ, युवा अध्यक्ष प्रमोद खांडगे यांनी दिला आहे.

९ मे २०२३ रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. पाणीसाठ्याची वस्तुस्थिती विचारात न घेता या बैठकीत कुकडी डावा कालव्यात उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला आमदार अतुल बेनके यांनी बैठकीत विरोध केला. या निर्णयाच्या निषेधार्थ आमदार बेनके यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर येथे नुकतेच सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर आता शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, कुकडीच्या पाणी वाटपाचा वाद चिघळला आहे. आज दुपारी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे संघटक हांडे, तालुका अध्यक्ष भुजबळ, युवा अध्यक्ष प्रमोद खांडगे, सचिन थोरवे, विजयराव आहेर, बाबुराव दाते, रमेश दाते यांनी येडगाव धरण जलाशयात उतरून आंदोलन केले. कुकडी डावा कालव्यात पाणी सोडल्यास धरण जलाशयात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जलसमाधी घेतील असा इशारा या वेळी देण्यात आला.

यावेळी शेतकरी संघटनेचे संघटक हांडे म्हणाले, कुकडी प्रकल्पात आज अखेर ५.८ टीएमसी(१९.५६ टक्के) उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. कुकडी प्रकल्प आठमाही असून शेती सिंचनासाठी उन्हाळी आवर्तन सोडण्याची प्रकल्पात तरतूद नाही. पंधरा दिवसापूर्वी उन्हाळी पाहिले आवर्तन पूर्ण झाले. असे असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार कुकडी डावा कालव्यात शेती सिंचनासाठी उन्हाळी दुसरे अवर्तन २२ मे पासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कुकडी डावा कालव्यात उन्हाळी दुसरे आवर्तन सोडू नये, या मागणीचे निवेदन कुकडी पाटबंधारे विभाग, पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे. असे असताना नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या दबावाखाली कुकडी डावा कालव्यात २२ मे पासून तीस दिवसांचे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

धरणग्रस्त शेतकरी व भूमिपुत्र यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी संघटनेने २२ मे रोजी पुकारलेल्या जलसमाधी आंदोलनात तालुक्यातील आजी, माजी लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय नेते यांनी सहभागी व्हावे.

- संजय भुजबळ (शेतकरी संघटनेचे जुन्नर तालुका अध्यक्ष) -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT