पुणे

शासकीय योजना - जमीन सुपीकता

CD

पान १४ - ३० साठी
००००००००००००००००००००००००००००००००००
नैसर्गिक शेती, जमीन सुपीकतेसाठी शासकीय योजना
----------------------------------------
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन ः

रसायन अवशेषमुक्त व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन ही १०० टक्के राज्य पुरस्कृत योजना आहे. प्रारंभी ही योजना विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांत राबविण्यात येत होती. २७ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार दुसऱ्या टप्प्यात या योजनेची व्याप्ती राज्यभर वाढविण्यास मान्यता देण्यात आली.

योजनेचे स्वरूप : ही गट आधारित योजना असून एका गटात ५० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. दहा गटांची एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली जाते.

कालावधी व अर्थसाह्य : योजनेचा कालावधी तीन वर्षांचा असून प्रथम वर्षी निवड झालेल्या लाभार्थी अथवा गटाला तीन वर्षे लाभ दिला जातो. तीन वर्षांत प्रति हेक्टर १३,२०० रुपये अर्थसाह्य दिले जाते. प्रति शेतकरी दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येतो.

प्रमुख बाबी :
- नैसर्गिक व सेंद्रिय शेतीवर आधारित प्रशिक्षण.
- शेतावर जैविक निविष्ठांची निर्मिती.
- सेंद्रिय प्रमाणीकरण.
- सेंद्रिय मालाची मूल्यवृद्धी व विक्री व्यवस्था.
- समूह संकलन केंद्रांची स्थापना.
- बाजारसाखळी विकसित करणे.
- तृतीय पक्ष संस्थेमार्फत सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण.
- उत्पादित मालाची प्रक्रिया व मूल्यवृद्धी.

उद्दिष्टे :
जैविक शेती पद्धतीद्वारे रसायनांचा वापर कमी करून योग्य उत्पादन घेणे, जमीन आरोग्य सुधारणे आणि निवडलेल्या उत्पादक घटकांची क्षमता विकसित करणे, हे योजनेचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना आवश्यक जैविक निविष्ठा शेतावरच तयार करण्यास प्रोत्साहन देणे, समूह संकलन केंद्रांच्या माध्यमातून बाजारसाखळी निर्माण करणे आणि सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, यावरही भर आहे.

-------------------------------------------
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान

कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, भारत सरकारने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान सुरू केले आहे. केंद्र शासनाच्या अंतिम मार्गदर्शक सूचना २६ डिसेंबर २०२४ रोजी जारी करण्यात आल्या आहेत. या योजनेत केंद्र व राज्याचा हिस्सा ६०:४० आहे.

योजनेचे स्वरूप : ही गट आधारित योजना असून एका गटात ५० हेक्टर क्षेत्र आणि १२५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
कालावधी व अर्थसाह्य : योजनेचा कालावधी दोन वर्षांचा आहे. प्रथम वर्षी निवड झालेल्या लाभार्थी अथवा गटाला दोन वर्षे लाभ दिला जातो. दोन वर्षांत प्रति हेक्टर ३०,६०० रुपये अर्थसाह्य दिले जाते. प्रति शेतकरी एक एकर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ दिला जातो.

योजनेतील प्रमुख बाबी :
- ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती कार्यक्रम.
- शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहनपर अर्थसाह्य.
- शेतावर नैसर्गिक निविष्ठा तयार करून त्यांचा वापर.
- नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब.
- पशुधन संगोपन.
- जैव-निविष्ठा संसाधन केंद्राची स्थापना.
- नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण.
- नैसर्गिक शेतीविषयक माहितीपत्रके.
- कृषिसखी मानधन व मोबाइलसाठी अर्थसाह्य.
- कृषिसखी व शेतकरी प्रशिक्षण.

उद्दिष्टे :
निसर्गावर आधारित शाश्वत शेती प्रणालीला प्रोत्साहन देणे, शेतावर तयार केलेल्या नैसर्गिक निविष्ठांचा वापर वाढविणे आणि बाहेरून निविष्ठा खरेदीवरील अवलंबित्व कमी करून उत्पादन खर्चात बचत करणे, ही योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. यासोबत जमिनीचे आरोग्य सुधारणे, पशुधनावर आधारित एकात्मिक कृषी पद्धतीला प्रोत्साहन देणे आणि शेतकरी ते शेतकरी विस्तार पद्धतीचा अवलंब करणे, यावर भर देण्यात आला आहे.

२०२६-२७ लक्ष्यांक :
राज्यासाठी ४९० नवीन शेतकरी गटांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या गटांमध्ये २४,५०० हेक्टर क्षेत्र आणि ६१,२५० शेतकऱ्यांचा समावेश अपेक्षित आहे. नवीन ४९० गटांसह मागील १,७०९ गट असे एकूण २,१९९ गट, तर नवीन २४,५०० हेक्टर आणि मागील ८५,४५० हेक्टर असे एकूण १,०९,९५० हेक्टर क्षेत्र अभियानात राहणार आहे.
------------------------------------

कृषी यांत्रिकीकरण ः
राज्यात कृषी यांत्रिकीकरण उपअभियान तसेच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. कृषी यांत्रिकीकरण उपअभियानात केंद्र व राज्याचा हिस्सा ६०:४० आहे, तर राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना १०० टक्के राज्य पुरस्कृत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे.

योजनेचे महत्त्व :
पशुधनाची घटती संख्या आणि शेतीच्या कामांसाठी मजुरांची टंचाई यामुळे शेतीमध्ये यांत्रिकीकरणाची गरज वाढली आहे. यंत्रांच्या वापरामुळे ठरावीक वेळेत शेतीची कामे पूर्ण करता येतात. तसेच निविष्ठांची बचत होऊन उत्पादन खर्चातही बचत होते.

उद्दिष्टे :
- अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे.
- ज्या भागात कृषी यांत्रिकीकरणाचा वापर कमी आहे, तेथे यंत्रांचा वापर वाढविणे.
- विभागनिहाय पीक रचनेनुसार गरज आणि मागणीच्या आधारे दर्जेदार कृषी अवजारे अनुदानावर उपलब्ध करून देणे.
- कृषी उत्पादन प्रक्रियेत अद्ययावत यंत्रसामग्रीच्या वापराला प्रोत्साहन देणे.
- शेतकऱ्यांना कृषी यंत्रसामग्री व अवजारे खरेदीस प्रोत्साहन देऊन कृषी यांत्रिकीकरणाला चालना देणे.

अनुदानाचे स्वरूप :
- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिसूचित कृषी यंत्रे व अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसाह्य दिले जाते.
- ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे, ट्रॅक्टरचलित अवजारे, ट्रॅक्टरचलित पीक संरक्षण अवजारे आणि पीक काढणीनंतरच्या प्राथमिक प्रक्रियेसाठी आवश्यक अवजारांचा समावेश आहे.
- सर्वसाधारणपणे यंत्राच्या किमतीच्या ४० ते ५० टक्के अथवा केंद्र शासनाने निश्चित केलेली कमाल अनुदान मर्यादा, यापैकी जी रक्कम कमी असेल, तेवढे अनुदान दिले जाते.
- ट्रॅक्टर घटकासाठी अल्प-अत्यल्प भूधारक, महिला तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी १.२५ लाख रुपये, तर इतर प्रवर्गासाठी १ लाख रुपयांपर्यंत अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
- सेवासुविधा केंद्राच्या स्थापनेसाठी भांडवली खर्चाच्या ४० टक्के अनुदान देण्यात येते.

लाभार्थी निवड :
- जिल्ह्यातील प्रवर्गनिहाय खातेदार संख्या, पेरणीखालील क्षेत्र, मागील वर्षातील मंजूर कार्यक्रम आणि मागील सहा वर्षांतील खर्चाचा विचार करून जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित केले जाते.
- इच्छुक शेतकऱ्यांकडून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्यात येतात. लाभार्थी निवडीमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने ज्येष्ठताक्रम निश्चित करून पूर्वसंमती दिली जाते. लाभार्थी निवडीपासून अनुदान देण्यापर्यंतची प्रक्रिया ऑनलाइन राबविली जाते.

अंमलबजावणी :
पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार खुल्या बाजारातून कृषी यंत्रसामग्री खरेदी करण्याची मुभा आहे. खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी स्वतःच्या बँक खात्यातून चेक, डीडी अथवा ऑनलाइन पद्धतीने देयक अदा करणे आवश्यक आहे. त्यानंतर थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) पद्धतीने अनुदानाची रक्कम आधार संलग्न बँक खात्यावर जमा केली जाते.
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: माणुसकीही ओशाळली! नेपाळच्या पुरात वाहून आलेल्या तिजोरीतून ९२ लाखांची चोरी, २९ जणांना अटक

Retirement Planning: 29 व्या वर्षीच सोडलं कॉर्पोरेट जग! वडिलांसोबत सुरू केला असा 4 स्टेप्सचा रिटायरमेंट प्लॅन

Nepal Floods: नेपाळच्या महापुरात महाराष्ट्रातील ४०४ पर्यटक अडकले; ३३८ नागरिक सुरक्षित, ६० जण अद्याप बेपत्ता

Sindkhed Raja Crime : पोलीस असल्याची बतावणी अन् वृद्ध दाम्पत्याची लूट; रक्षाबंधन आटोपून परतताना २.१० लाखांचा ऐवज लंपास

Maharashtra Monsoon Prediction : नागपूरच्या संविधान चौकात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT