necessary to create awareness in villages about snake bites Dr Sadanand Raut sakal
पुणे

पावसाळ्यात सर्पदंश व उपाययोजना याबाबत गावो-गावीजनजागृती होणे गरजेचे- डॉ सदानंद राऊत

जागतिक सर्पदंश समितीचे तज्ञ डॉ सदानंद राऊत

डी. के. वळसे पाटील

मंचर : “पावसाळा सुरु झाल्यामुळे शेतात काम करताना शक्यतो पायवाट सोडून जाऊ नये. अगदीच आवश्यक असल्यास गवतात शिरण्याआधी आपल्या मार्गात साप नाही याची खात्री करून घ्यावी. गवतातून चालताना पायात बूट घालावेत. उंच गवतात वावर असणाऱ्या व्यक्तींनी नडगी व पोटरी यांचे संरक्षण करू शकतील अशी आवरणे बांधणे आवश्यक आहे.घरात जमिनीवर झोपणे टाळावे. झोपेच्या आधी अंथरूण तपासावे. योग्य उपाय आणि सावधगिरी बाळगल्यास सर्पदंश व त्यामुळे होणारे मृत्यू रोखता येऊ शकतात. याबाबत समाजात जनजागृती करण्याचे काम आशा सेविकांनी करावे.”असे आवाहन जागतिक सर्पदंश समितीचे तज्ञ डॉ.सदानंद राऊत यांनी केले.

मंचर (ता.आंबेगाव) येथे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन प्रकल्पाअंतर्गत सर्पदंश टाळण्यासाठी व सर्पदंश झाल्यानंतर तातडीच्या उपाय योजनेबाबत आंबेगाव तालुक्यातील २५० आशा सेविका, सार्वजनिक स्वास्थ्य अधिकारी, गटप्रवर्तक यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी डॉ. राऊत बोलत होते. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सर्पदंश तज्ञ डॉ. पल्लवी राऊत उपस्थित होत्या. यावेळी शून्य सर्पदंश प्रकल्पाचा माहितीपट दाखविण्यात आला.

डॉ. पल्लवी राऊत म्हणाल्या “पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात दोन हजार ५०० आशा सेविकांना सर्पदंश टाळण्यासाठी आवश्यक उपाय योजनांचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे जनजागृती झाल्यानंतर सर्पदंश व मृत्यूचे प्रमाण घटण्यास मदत होईल.सर्पदंश झाल्यानंतर ताबडतोब रुग्णाला प्राथमिक उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात नेले पाहिजे. याबाबत जनजागृती हे काम अत्यंत महत्वाचे आहे.”

“गेली ३० वर्ष डॉ. राऊत दांपत्य यांच्यामुळे सर्पदंश झालेल्या हजारी रुग्नानाचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या कार्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. त्यांच्या शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पासाठी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सहकार्य करणार आहेत.”असे विवेक वळसे पाटील यांनी सांगितले. डॉ.तुषार पवार यांनी आभार मानले.

“भारतामध्ये दरवर्षी २७ लाख लोकांना सर्पदंश होतो. ५० हजार लोकांचा मृत्यू होतो. सर्पदंशाचे बहुतांश रुग्ण गरीब तरुण शेतमजूर,महिला व मुले असतात.पावसाळ्यात याबाबत गाव व वाड्या वस्त्यावर जनजागृती मोहीम राबविणे गरजेचे आहे.”

- डॉ.सदानंद राऊत, तज्ञ जागतिक सर्पदंश समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: इंडिया आघाडीसोबत अटी शर्थी नाहीत, आम्ही दोघे भाऊ खंबीर; मनसे सोबत युतीवर उद्धव ठाकरेचं मोठं विधान!

Latest Maharashtra News Updates : वनताराचे सीईओ विहान करनी यांचे राजू शेट्टी यांच्यासमोर लोटांगण

Dhananjay Munde: अजित पवारांनी धनंजय मुंडेंसाठी पर्याय शोधला? त्यांना भरभरुन दिलं, बाबरी मुंडेंना काय मिळणार? एका दगडात तीन पक्षी

RBI SIP: लहान गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! RBIने SIP गुंतवणूक केली सोपी, कोणते नवीन फिचर आणले?

CRPF Jawan Vehicle Accident : काश्मीरमध्ये CRPF जवानांचं वाहन दरीत कोसळलं; दोघांचा मृत्यू, 12 जण जखमी

SCROLL FOR NEXT