कोरोनाचे संकट तीव्र होत असल्यामुळे राज्यात लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांच्या सोयीसाठी काही ठिकाणी गरजेनुसार शिथिलता आणण्याचा प्रयत्न असेल. दोन दिवसांत त्याबद्घलची माहिती नागरिकांना देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर नेमक्या कोणत्या उपाययोजनांची गरज आहे, प्रशासन काय करीत आहे, विविध घटकांचे यासंदर्भात काय म्हणणे आहे. याबाबतचा हा आढावा...
प्रशासन स्तरावर आवश्यक बाबी
नागरिकांनी घ्यायची काळजी
अशी आहे प्रशासकीय तयारी
हे सध्या बंद आहे
लॉकडाउनमध्ये शिथिलता कशी आणि कोठे द्यायची, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप आदेश आलेले नाहीत. मात्र, अत्यावश्यक सेवा आणि वस्तू यांचा पुरवठा विनाअडथळा सुरूच राहणार आहे.
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी
रुग्णांची संख्या १४ एप्रिलनंतर कमी होते का वाढते, यावरच शिथिलता देण्याचा निर्णय अवलंबून असेल. नागरिकांना असे आवाहन करण्यात येते, की रेशन दुकानांमध्ये गर्दी करू नये.
- के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे
शेतीमाल शहरापर्यंत पोचविण्यासाठी वाहतूक व्यवस्था गरजेची आहे. मोठ्या मैदानांवर खुल्या बाजारपेठा निर्माण करण्याचीही गरज आहे. तेथे खरेदीसाठी अटींवर परवानगी देता येईल.
- शेखर गायकवाड, आयुक्त, पुणे महापालिका
किराणा-भुसार दुकाने आणि वाहतूक विनाअडथळा सुरू ठेवावी. भाजीपाला, फळेही मिळायला पाहिजे. किराणा दुकाने दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवावीत.
- पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, पुणे मर्चंटस चेंबर
मार्केट यार्डातील घाऊक भुसार बाजार सुरू असायला हवा. मात्र, तेथे किराणा दुकानदारांनाच प्रवेश द्यायला हवा. गर्दी टाळण्याच्या उद्देशाने किरकोळ दुकानदारांकडून ऑनलाइन स्वरूपात यादी मागवून डिलिव्हरी करता येईल.
- राज अग्रवाल, व्यावसायिक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.