पुणे

लॉकडॉऊन नको; लसीकरण वाढवा; उद्योग-व्यापारी संघटनांची मागणी

मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे १५ मे पासून पुन्हा लॉकडॉऊन नको, अशी मागणी व्यापार-उद्योग क्षेत्रांतून होऊ लागली आहे. एक महिना थांबलेले अर्थचक्र सुरळीत केव्हा होणार, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. लसीकरणाचा वेग वाढवा, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन काटेकोर होईल, यावर प्रशासनाने लक्ष केंद्रीत करून आरोग्य व्यवस्था सक्षम करावी, असे उद्योग- व्यापार क्षेत्राचे म्हणणे आहे.

शहरातील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. मात्र, अन्य जिल्ह्यांत, राज्यांतील संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांना लागू होणारे नियम आता पुण्याला लागू करा नका, अशी आग्रही मागणी शहरातील उद्योग क्षेत्राने केली आहे. पुण्यात एप्रिलपासूनच लॉकडॉऊन सुरू झाला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शहर, पिंपरी चिंचवड आणि परिसरात सध्या अत्यावश्यक सेवेशी आणि आयात- निर्यातीशी संबंधित उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अन्य उद्योग सुरू केव्हा होणार, त्यांच्या ऑर्डर्स केव्हा पूर्ण होणार, पीएमपी बंद असल्यामुळे कामगारांच्या वाहतुकीलाही अडचणी येत आहेत, त्यामुळे पुन्हा लॉकडॉऊन केल्यास उद्योग- व्यवसाय रसतळाला जातील, असेही त्यांनी म्हटले आहे. कामगारांना कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी लसीचे डोस अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. तसेच हॉटेल व्यवसायही बंद पडले आहेत, याकडेही उद्योग क्षेत्राने लक्ष वेधले.

सुधीर मेहता (अध्यक्ष - एमसीसीआयए) : लॉकडॉऊनचा राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर करणे योग्य होणार नाही. प्रत्येक शहरातील परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे राज्य सरकारचा टास्क फोर्स, आरोग्यतज्ज्ञ यांनी या बाबतचा निर्णय घेतला पाहिजे. स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतला पाहिजे. लॉकडॉऊन हा सरसकट पर्याय होऊ शकत नाही.

फत्तेचंद रांका (अध्यक्ष- पुणे व्यापारी महासंघ) : रुग्ण वाढत होते तेव्हा शहरातील व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे एक महिन्यापासून व्यवसाय बंद आहेत. आता रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली पाहिजे. पुन्हा लॉकडॉऊन लागू करणे चुकीचे होईल. आकडेवारी तपासून अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिले पाहिजे.

संदीप बेलसरे (अध्यक्ष - पिंपरी चिंचवड लघुद्योग संघटना) : उद्योगांतून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. त्यातूनच अर्थव्यवस्था सुरू राहते. अनेक उद्योग बंद असल्यामुळे उद्योजक आणि कामगार अडचणीत आले आहेत. त्या घटकांचाही विचार करणे गरजेचे आहे. सरसकट लॉकडॉऊन हा काही उपाय नाही. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT