one killed in Manjari wagholi road accident pune  esakal
पुणे

मांजरी-वाघोली रस्त्याच्या कामाने अखेर घेतला एक बळी

रस्त्याच्या कामातील धोका व असुरक्षितता निदर्शनास आणूनही अधिकारी व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे येथील रस्त्यावर झालेल्या अपघातात एका तरूणाला आपला जीव गमवावा लागला

कृष्णकांत कोबल

मांजरी : रस्त्याच्या कामातील धोका व असुरक्षितता निदर्शनास आणूनही अधिकारी व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे येथील रस्त्यावर झालेल्या अपघातात एका तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ईश्वरकुमार राजेंद्रकुमार पुनिया (वय २८, रा. देहूगाव, पुणे. मूळ रा. शेगांव, बुलढाणा) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. शनिवारी (ता. ९) पाहटेच्या सुमारास हा अपघात झाला. ईश्वरकुमार मोटारसायकलवरून मांजरी बुद्रुककडून वाघोलीच्या दिशेने जात होता. येथील स्मशानभूमीच्या अलिकडील वळणावर रस्ता लक्षात न आल्याने मोटारसायकलसह तो डाव्याबाजूला खड्ड्यात पडला.

सकाळी त्याठिकाणी नागरिकांना हा तरूण पडलेला दिसला. त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले असता तो मृत झाल्याचे समजले. दरम्यान, अपघातात आणखी एक तरूण जखमी झाला असल्याचे समजत आहे. तो देहू येथील रूग्णालयात उपचार घेत आहे. त्याचा तपास हडपसर पोलीस करीत आहेत. पीएमआरडीएकडून मांजरी-वाघोली रस्त्याचे रूंदीकरण व काँक्रीटीकरणचे काम केले जात आहे. हे काम करताना वाहतूक सुरक्षेची आजिबात काळजी घेतली जात नसल्याचे दिसते. धोक्याच्या सूचना, सिग्नल, रिफ्लेक्टर, सेवा व पर्यायी रस्त्याचे फलक लावलेले नाहीत. प्रवासी व नागरिकांनी वारंवार निदर्शनास आणूनही अधिकारी व ठेकेदारांकडून त्याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष होत आहे. त्यामुळे दररोजच या मार्गावर छोटेमोठे अपघात होत आहेत. सकाळनेही दोन वेळा या निष्काळजीपणाबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. अधिकाऱ्यांकडून त्या त्या वेळी काळजी घेण्याचे अश्वासन दिले.

मात्र, प्रत्यक्षात सुरक्षीत वाहतुकीची कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. शनिवारी (ता. ९) झालेल्या अपघातात याच निष्काळजीपणामुळे बळी गेल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. रस्त्याचे काम करीत असताना वाहतुकीच्या सुरक्षेबाबत विविध माध्यमातून वारंवार कल्पना देऊनही ठेकेदार व अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. वाहतूक पोलिसांनीही याबाबत निष्काळजीपणा दाखविल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे. संबंधीत सर्वांना या घटनेस जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मांजराईनगर नागरिक कृतीसमितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे, अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर व जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दत्ता ननावरे यांनी केली आहे. दरम्यान, पीएमआरडीएचे कनिष्ठ अभियंता स्वरूप शिरगुप्पे यांच्याशी कालपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Deputy Chief Minister Ajit Pawar: राहुल गांधींच्या आरोपात तथ्य नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार; 'हरल्यावरच ईव्हीएमची आठवण येते, जिंकल्यावर नाही'

Latest Marathi News Updates : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राखचा खून करून संशयितांचे मिरजेकडे पलायन

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Asia Cup 2025 : अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरू असतानाच वडिलांचं निधन, श्रीलंकेच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT