Wedding 
पुणे

पुणे : आता 'शुभमंगल सावधान' म्हणा 20 लोकांमध्येच!

सकाळवृत्तसेवा

पुणे : लग्नासाठी 50 जणांना परवानगी असतानाही या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने यापुढे लग्न केवळ वीस जणांमध्येच आटोपावे लागणार आहे. 'अनलॉक'च्या नव्या नियमात महापालिकेने ही तरतूद केली असून, त्याची आजपासून अंमलबजावणी सुरू होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऐन लग्नाच्या सीझनमध्ये लॉकडाऊन आल्याने अनेकांचे विवाह पुढे ढकलण्यात आले. मात्र, ज्यांच्या तारखा निश्चित झाल्या होत्या, त्यांच्यासाठी राज्य सरकारने वधू पक्षाकडील पंचवीस आणि वर पक्षाकडील पंचवीस अशी 50 जणांना लग्नासाठी परवानगी दिली होती. 13 जुलैला जेव्हा पुन्हा लॉकडाऊन सुरु झाले, त्यावेळी पूर्व नियोजित लग्नांना वीस लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली होती. मात्र, या काळातील विवाहांची संख्या नगण्य होती. लाॅकडाउन उठल्यानंतर पुन्हा पन्नास लोकांची लोकांच्या उपस्थितीची परवानगी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र पन्नास लोकांची परवानगी घेऊन शंभर ते पाचशे लोकांपर्यंत लग्नाला गर्दी होऊ होऊ लागल्याची उदाहरणे समोर आली. त्यातून काही ठिकाणी संसर्ग झाल्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे यापुढे लग्न समारंभासाठी केवळ 20 लोकांच्या उपस्थितीलाच परवानगी देण्यात आली आहे. अत्यंत मोजक्या लोकांमध्येच विवाह पार पाडावा लागणार असल्याने वधू- वर हिरमुसले असले तरी अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

पुढच्या महिन्यात लग्न असणाऱ्या वधूचे पिता एम. बी. जाधव म्हणाले, "या निमित्ताने लग्नाच्या अनावश्यक खर्चाला आणि बडेजावाला आळा बसला आहे, ही चांगली गोष्ट आहे. यातून सर्वांनीच योग्य तो धडा घ्यायला हवा. लग्नासाठी केली जाणारी उधळपट्टी थांबवायला हवी. यापेक्षा लग्नावर खर्च  केले जाणारे लाखो रुपये वधू-वरांसाठी भविष्याची तरतूद म्हणून ठेवल्यास त्याचा उपयोग होईल व संकटाच्या काळातही दिलासा मिळेल. या निर्णयाचे मी स्वागत करतो आणि योग्य ती दक्षता घेऊनच मुलीचा विवाह केला जाईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कात्रज येथील माऊली मंगल कार्यालयाचे संचालक शुभम कदम म्हणाले, "वीस लोकांनाच लग्नासाठी परवानगी असल्याने आता लोक मंगल कार्यालयांकडे येणारच नाहीत. मंगल कार्यालयांना ही एवढ्या कमी लोकांची व्यवस्था करणे परवडणार नाही. मात्र महापालिकेने केलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून वीस लोकांमध्ये पूर्व नियोजित विवाह पार पाडले जातील. पुढील महिन्यात या नियमांमध्ये बदल होण्याची अपेक्षा आहे."

(Edited By : Krupadan Awale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT