पुणे

अजेंडा रेटण्याची सत्ताधाऱ्यांची घाई;तिजोरीतील खडखडाटामुळे प्रशासन कात्रीत 

सकाळवृत्तसेवा

पुणे - "जेवढे उत्पन्न मिळेल; त्यातून विकासकामांना प्राधान्य द्या. समान पाणीपुरवठा, जायका आणि चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे कामांना वेग द्या,' असा आग्रह सत्ताधारी भाजपने धरला आहे. एकीकडे कोरोनामुळे तिजोरीत झालेला खडखडाट आणि दुसरीकडे सत्ताधाऱ्यांना आपला "अजेंडा' राबविण्याची झालेली घाई, अशा कात्रीत महापालिका प्रशासन सापडले आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. त्याचा थेट परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर झाला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार कसे करावे, असा प्रश्‍न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी अनावश्‍यक कामांना कात्री लावण्याबरोबरच निधीची तरतूद नसलेली कामे न करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्याचा फटका शहराला जसा बसणार आहे, तसाच सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पुणेकरांना दाखविलेल्या स्वप्नांना देखील बसणार आहे. त्यामुळे यावर्षी तरी अनेक योजनांची अंमलबजावणी होणार नसल्याचे स्पष्ट आहे. या पार्श्‍वभूमीवर आर्थिक स्थिती, नव्या-जुन्या प्रकल्पांवरील परिणाम, उत्पन्नवाढीचे नवे पर्याय, त्याची अंमलबजावणी या बाबींवर चर्चा करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पदाधिकारी-वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते धीरज घाटे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयक, डॉ. कुणाल खेमणार उपस्थित होते. या बैठकीत सत्ताधारी भाजपने विकासकामांसाठीचा आग्रह प्रशासनाकडे धरला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जायका, उड्डाणपुलाच्या कामाला वेग 
प्रशासनातील काही अधिकाऱ्यांमुळे "जायका' प्रकल्पाची अद्यापही अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. मात्र हा प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहेत. त्यासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची सूचना सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला केली आहे. त्याचसोबत चांदणी चौकातील उड्डाणपुलासह अर्थसंकल्पातील काही नव्या योजनांची कामे हाती घेऊन त्यांना वेग देण्याची सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी केली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

समाविष्ट गावांना सुविधा 
महापालिकेत समावेश झालेल्या 11 गावांतील रखडलेली कामे करण्याचे नियोजन सत्ताधाऱ्यांनी केले आहे. त्यात, गावकऱ्यांना पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक आणि आरोग्य सुविधा पुरविण्याला प्राधान्य आहे. प्रत्येक गावांमधील आवश्‍यक त्या कामांसाठी निधी वापरण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. 

महापालिकेकडील उत्पन्न, कोरोनावरील उपाय खर्च आणि विकासकामांचा खर्च, यांचा ताळमेळ घालून कामांना प्राधान्य देणार आहे. सध्या थांबलेली कामे वेगाने करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी उत्पन्न वाढीवर भर देण्यात आला आहे. नव्या आर्थिक नियोजनाची अंमलबजावणी केली जाईल. 
- मुरलीधर मोहोळ, महापौर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT