पुणे

Vidhan Sabha 2019 : पुण्यात मतदानाची टक्केवारी कमीच; पण कोथरुडमध्ये...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरातील मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी दुपारी तीनपर्यंत खूपच कमी असून, मतदारांच्या निरुत्साहामुळे यंदा मतदानाची टक्केवारी पन्नास टक्‍क्‍यांच्या आसपास पोहोचणार की नाही, अशी स्थिती आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील कसबापेठ व पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील मतदानकेंद्रांवर मतदारांनी सर्वांत कमी उपस्थिती लावली आहे.

कसबा पेठेत दुपारी तीन वाजेपर्यंत 26.33 टक्के, तर पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये मतदारसंघात 27.72 टक्के मतदानांची नोंद झाली. त्याखालोखाल शिवाजीनगरमध्ये 28.76 टक्के मतदान झाले. या तीन मतदारसंघांत भाजपच्या सामना आघाडीतील काँग्रेसशी असून, अन्य पक्षांचे उमेदवार, तसेच अपक्षही रिंगणात आहेत. हडपसरमध्ये होत असलेल्या चुरशीच्या लढतीमध्ये शहरातील सर्वांधिक म्हणजे 41.16 टक्के मतदानाची नोंद आत्तापर्यंत झाली असून, मतदान संपेपर्यंत तेथील मतदान 55 टक्‍क्‍यांचा आकडा पार करण्याची शक्‍यता आहे.

कोथरूड या सर्वांधिक चर्चेच्या मतदारसंघात दुपारपर्यंत 35.32 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पर्वतीमध्ये 33.06 टक्के, तर वडगावशेरीमध्ये 32.07 टक्के मतदान झाले. मतदानाच्या शेवटच्या दोन तासांना मतदानाचा वेग नेहमीच वाढतो. या कालावधीत किमान 14 ते 15 टक्के मतदानाची नोंद होते. ती गृहित धरली, तरी शहरातील मतदान 50 टक्‍क्‍यांच्या आसपासच पोहोचण्याची शक्‍यता आहे. 

50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान

विधानसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ वगळता शहरातील अन्य सातही मतदारसंघांत पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. कसबा पेठ मतदारसंघात 2014 मध्ये सर्वांधिक म्हणजे 61 टक्के मतदान झाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT