पुणे

अंडी वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला पोलिसांकडून मारहाण

डी के वळसे-पाटील

मंचर : जुन्नर तालुक्यातून अंबरनाथ भागात अंडी घेऊन जाणाऱ्या ट्रकला पोलिसांनी चांगले सहकार्य केले. पण ट्रक माघारी येत असताना मात्र अंबरनाथ मुरबाड शहापूर गाडी फुल येथे ट्रकचालकाला काठ्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे मुंबई भागात ट्रक घेऊन जाण्यास चालकांनी नकार दिल्यामुळे जुन्नर तालुक्यात गेल्या चार दिवसापासून सोळा लाख अंडी पडून आहेत.

जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणाऱ्या वाहनांना सवलत असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. पण पोलिसांच्या या कारवाई बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ओतूर येथील साई पोल्ट्रीचे मालक ॲड. सचिन तांबे  थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोबाईलद्वारे संपर्क करून घडलेल्या प्रकाराची माहिती देणार आहेत.

जुन्नर तालुक्यात अंडी उत्पादन करणाऱ्या ८ पोल्ट्री आहेत. प्रत्येक परतून सरासरी 35 ते 40 हजार अंड्याचे उत्पादन निघते. ही अंडी प्रामुख्याने पुणे व मुंबई शहरात पाठवले जातात. पुणे जिल्ह्यातील ओतूर येथील लेअर फार्मर्सच्या मालकीचा अंड्यांचा ट्रक रविवारी ता 22 रोजी रात्री मुंबईला जाताना माळशेज घाटातील कोंडीत अडकला.

पोलिसांनी अंड्याचा ट्रक पाहिला. अत्यावश्यक सेवा म्हणून दोन किलोमीटरची रांग तोडून अंड्याचा ट्रक मुंबईला रवाना केला. पण तोच ट्रक अंडी खाली केल्यानंतर तेथेच अंबरनाथ पोलिसांनी मारहाण केली. माघारी परतताना अंबरनाथपासून पुढच्या मुरबाड, उमरोली, शहाड पूल चेक नाक्यावर पोलिसांनी दमदाटी, मारहाण केली नितीन उल्हास तांबे असे ट्रकचालकाचे नाव आहे. ही माहिती वाऱ्यासारखी सर्व अंडी वाहतूक करणाऱ्या चालकांमध्ये पसरली.

आता ड्रायव्हर म्हणतात, आम्ही मुंबईला अंड्यांची गाडी नेणार नाही. ओत्तूर येथीलसाई पोल्ट्री मध्ये चार लाख अंडी पडून आहेत तर जुन्नर तालुक्यात एकूण 16 लाख अंडी सध्या पडून आहेत. आधीच अडचणीत असलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांचे आतोनात हाल सुरू झाले आहेत.

सरकारी स्टिकर्स द्या

यंत्रणांनी कुठलीही व्यवस्था लावली नाही. इथे, अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांना सरकारी स्टिकर किंवा पास द्या. म्हणजे रिकाम्या गाड्यांना त्रास होणार नाही. 

तसेच पंधरा दिवसांपूर्वीच लॉक डाऊनची वेळ येणार हे स्पष्ट होते. प्रशासकीय यंत्रणा नेमके काय काम करत होती, असा प्रश्न निर्माण होतो.

यासंदर्भात ऍड तांबे म्हणाले, मुंबई शहर उपनगरातून अंड्यांना मागणी वाढलेली आहे. पण पोलिसांच्या दहशतीमुळे चालक आता ट्रक-टेम्पो घेऊन मुंबईलाजाण्यास धजावत नाहीत. यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घालावे या मागणीसाठी आम्ही त्यांच्यासोबत संपर्क करत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT