Police Commissioner Ritesh Kumar over Traffic awareness campaign in Pune rto transport sakal
पुणे

वाहतूक व्यवस्थेत निश्चितच चांगले बदल होतील; पोलिस आयुक्त रितेश कुमार

पुणे शहर वाहतूक पोलिस यांच्या वतीने पुण्यात रविवारपासून (ता. २३) वाहतूक जनजागृती अभियान

सकाळ वृत्तसेवा

‘सकाळ’ माध्यम समूह आणि पुणे शहर वाहतूक पोलिस यांच्या वतीने पुण्यात रविवारपासून (ता. २३) वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी ‘सकाळ’चे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट अनिल सावळे यांनी केलेली खास बातचीत...

प्रश्न : शहरात पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी आहे. या तुलनेत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अशा कारणांमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे. ही परिस्थिती सुधारण्याबाबत आपण काय सांगाल?

उत्तर : देशात सर्वाधिक ४० लाख वाहने पुण्यात आहेत. महापालिका पायाभूत सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. शहरात मेट्रो, उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीबाबत नागरिकांची तक्रार असणे स्वाभाविक आहे. वाहतूक पोलिस, महापालिका आणि पीएमआरडीए यांचा योग्य समन्वय आहे. मागील चार महिन्यांपासून वाहतूक व्यवस्था सुधारण्याबाबत चांगले प्रयत्न सुरू आहेत. जास्तीत जास्त वाहतूक पोलिस सिग्नल चौकात आणि रोड पेट्रोलिंगवर राहावेत, असा आमचा प्रयत्न आहे. परंतु आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे.

प्रश्न : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकासह इतर प्रमुख रस्त्यांवर नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. अवजड वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत आपण काय उपाययोजना करीत आहात?

उत्तर : वाहनांची वर्दळ असलेल्या सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या कालावधीत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंद करण्याबाबत सर्व पोलिस ठाणी आणि वाहतूक पोलिसांना सूचना देण्यात येतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात मेट्रोचे काम सुरू असून, सहा ते आठ महिन्यांत काम पूर्ण होइल. पर्यायी एकेरी मार्ग केले असून, तेथील वाहतूक कोंडीची समस्या बऱ्यापैकी कमी झाली आहे.

प्रश्न : शहरात ४० हून अधिक अपघातप्रवण स्थळ (ब्लॅक स्पॉट) आहेत. अशा ठिकाणी (उदा. नवले पूल) वारंवार अपघात होत आहेत. त्यात नाहक लोकांचे बळी जात आहेत. अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना करीत आहात?

उत्तर : शहरात २०२१ मध्ये अपघातांमध्ये ८४ जणांचा मृत्यू झाला. २०२२ मध्ये त्यात वाढ होऊन अपघातात १०७ जणांचा बळी गेला. ‘ब्लूमबर्ग’ संस्थेच्या मदतीने मुंबई आणि दिल्ली शहरात अपघातात घट झाली आहे. या धर्तीवर पुणे पोलिसही ‘ब्लूमबर्ग’ संस्थेच्या मदतीने काम करीत आहेत. अपघातप्रवण स्थळांवर पायाभूत सुविधा सुधारण्यासोबतच वाहतूक व्यवस्थेत काही बदल करावे लागतील. जेणेकरून अपघातांचे प्रमाण कमी होइल. एक-दोन महिन्यांत त्याठिकाणी प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू होइल.

प्रश्न : पुणे पोलिसांना वाहतूक नियमन करण्यासोबतच गुन्हे उघडकीस आणण्यात सीसीटीव्हींची मदत होत आहे. सध्या शहराचा विस्तार वाढला आहे. त्यादृष्टीने काय प्रयत्न सुरू आहेत?

उत्तर : पुण्यासारख्या शहरात सध्या तुलनेत सीसीटीव्हींची संख्या कमी आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी दीड हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. याशिवाय स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आणि ऑटोमॅटिक ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे जूनपासून १२५ जंक्शन कव्हर करीत आहोत. भविष्यात वाहतूक व्यवस्थेत निश्चितच चांगले बदल दिसून येतील.

‘सकाळ’ माध्यम समूह आणि पुणे शहर वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त अभियानामुळे वाहतूक नियमांबाबत जागृती होण्यास मदत होइल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हे अपघाताला निमंत्रण देणे आहे. हे जनजागृती अभियान नागरिकांसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल.

- रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

पंचनाम्याचे निकष शेतकऱ्यांच्या जिव्हारी! अतिवृष्टीच्या भरपाईसाठी ‘हे’ निकष अडचणीचे; ॲग्रीस्टॅक क्रमांक, ई-पीक पाहणी नोंदीचा अडथळा; शेतातील जिओ टॅगिंग फोटोचीही अट

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

SCROLL FOR NEXT