पुणे

पुणे : वडापावचे दरही आता परवडेना...

डी के वळसे-पाटील

मंचर : गरिबांची पोटपूजा, मध्यमवर्गीयांचे फावल्या वेळेतील खाद्यपदार्थ आणि श्रीमंतांसाठी चवीचे खाणे असलेला वडापाव आता 12 रुपयांवर गेला आहे. तेल व बटाट्याच्या दरामध्ये झालेल्या वाढीमुळे त्याचा परिणाम वडापावच्या किमतीवरही झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, मंचर शहरात अजूनही वडापावचे दर स्थिर असून दहा रुपयेच आहेत.

वडा तळण्यासाठी प्रामुख्याने पाम व सोयाबीन तेलाचाच वापर केला जातो. गेल्या 15 दिवसापासून मलेशीया देशातून होणाऱ्या पाम तेलाची आवक थांबलेली आहे. तर अति व अवकाळी पावसामुळे जवळपास ५० टक्के सोयाबीनचे पिक वाया गेले आहे. त्यामुळे या दोन्ही तेलाची उपलब्धता कमी झाली आहे. पाम तेल व सोयाबीन तेलाच्या किमतीमध्ये प्रति किलोला अनुक्रमे 20 व 17 रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती मंचर येथील घाऊक किराणा मालाच्या व्यापाऱ्यांने दिली.

बटाट्याचे बाजारभाव वाढले आहेत. दहा ते बारा रुपये प्रति किलो मिळणारा बटाटा प्रतिकिलो 25 रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे पूर्वी दहा रुपयाला मिळणारा वडापाव आता बारा रुपयापर्यंत गेला आहे, अशी माहिती अवसरी बुद्रुक येथील वडापाव विक्रेते विणू हिंगे यांनी दिली.

मंचर शहरात मात्र अजून बटाटा वडा विक्रीचा भाव स्थिर आहेत. सध्या दहा रुपयाने वडापाव विक्री करणे परवडत नाही. पण खवय्यांच्या प्रेमापोटी अजून बाजारभाव वाढवलेले नाहीत. असे मंचर येथील वडापाव विक्रेते पिंटू कोटकर व अनिल भैये यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: सूर्यकुमार-शिवम दुबेही मुंबईसाठी खेळणार की नाही? महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Latest Marathi News Live Update : भारतातील अमेरिकन दूतावासाचे ट्विट व्हायरल

Bangladesh Hindu Youth Murder Reason : बांगलादेशातील हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येमागचे खरे कारण अखेर आले समोर!

Mumbai: राज्यात दोनच विमानतळांना प्रेरणादायी नावे, पण कोणत्या? अहवालातून महत्त्वाची माहिती समोर

Mumbai Water Supply: मुंबईत २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पाणी संकट! 'या' भागांसाठी बीएमसीकडून महत्त्वाचा इशारा जारी, वाचा यादी...

SCROLL FOR NEXT