water shortage
water shortage esakal
पुणे

Water Shortage : पाणी टंचाइमुळे पुणेकर नागरिक हैराण

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिकेने शहरातील पाणी पुरवठा गुरुवारी (ता. २७) बंद ठेवला होता. पण त्यानंतर पुढील दोन दिवस पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही.

पुणे - पुणे महापालिकेने शहरातील पाणी पुरवठा गुरुवारी (ता. २७) बंद ठेवला होता. पण त्यानंतर पुढील दोन दिवस पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. शुक्रवारी (ता. २८) आणि शनिवारी (ता. २८) शहराच्या अनेक भागातील तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. महापालिकेचे टँकर भरण्यासाठीही पाणी शिल्लक नव्हते. मात्र, भर उन्हाळ्यात सलग तीन दिवस पाणी नसल्याने नागरिक हैराण झाले.

पाणी पुरवठा विभागाला शहराच्या विविध भागात देखभाल दुरुस्तीची अनेक कामे करायची होती. धार्मिक सण असल्याने या काळात पाणी बंद होऊ नये यामुळे प्रशासनाने हीकामे एक महिना पुढे ढकलली होती. त्यानुसार गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद करून सुमारे २० ठिकाणी वॉल्व्ह बदलणे, जलवाहिनी दुरुस्त करणे जलवाहिनी स्थलांतर करणे अशी कामे हाती घेण्यात आली.

गुरुवारी रात्री हे काम पूर्ण होऊन शुक्रवारी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होणे आवश्‍यक होते, पण शुक्रवारी शहराच्या अनेक भागात कोथरूड, बाणेर, बालेवाडी, मॉडेल कॉलनी, प्रभात रस्ता शिवाजीनगर, कोंढवा, वानवडी, कात्रज, आंबेगाव, येरवडा, हडपसर, मुंढवा या भागात पाणी आले नाही. शनिवारीही बाणेर, बालेवाडी, कोंढवा, कात्रज या भागात अनेक ठिकाणी पाणी आले नाही. त्यामुळे सलग तीन दिवस पाणी नसल्याने नागरिकांचे हाल झाले.

टँकरभरण्यासाठीही पाणी नाही

चतुःश्रृंगी टाकीवर अवलंबून असलेल्या भागात शनिवारीही पाणी नव्हते. अनेक नागरिकांनी दुपारी टँकरसाठी फोन केले असता टाकीवर पाणी आले नाही असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागला.

गुरुवारी पाणी बंद करून शहरात सुमारे २० ठिकाणी दुरुस्तीचे कामे करण्यात आली. ही कामे गुरुवारी रात्री पूर्ण होणे अपेक्षीत होते, पण शुक्रवारी पहाटेपर्यंत कामे सुरू होती. त्यामुळे टाक्या भरून सर्व भागात पाणी पुरविण्यासाठी उशीर झाला. शुक्रवारी नागरिकांच्या तक्रारी होत्या, पण शनिवारी बहुतांश भागात पाणी गेले आहे. रविवारी पाणी पुरवठा सुरळीत होईल.’’

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग

वारजे येथे महत्त्वाचे काम पूर्ण

वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून कोथरूड, येरवडा, बाणेर बालेवाडी, शिवाजीनगरचा काही भाग येथे पाणी जाते. वारजेवरून होळकर पूल येथील टाकीवर जी जलवाहिनी जाते तेथे वॉल्व्ह खराब झाला होता. त्यामुळे होळकर पूल टाकीवर काही काम करायचे असले की वारजे येथून पाणी बंद करावे लागत होते. त्यामुळे त्याचा फटका कोथरूड, बाणेर, बालेवाडी भागाला बसत होता. मात्र,आता येथे स्वतंत्र वॉल्व्ह बसविण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच येरवडा येथे मेट्रोच्या कामामुळे जलवाहिनी स्थलांतरित केली आहे, असे पावसकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT