पुणे

Pune Crime: 'फोनवर कोणाशी बोलतोस?', असं विचारल्याने चिडलेल्या प्रियकराची प्रेयसीला बेदम मारहाण; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सुवर्णा कांचन

उरुळी कांचन: 'फोनवर कोणाशी बोलतोस, अशी विचारणा केल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसीला बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता. २६) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका हॉटेलमध्ये घडली.

याप्रकरणी ३६ वर्षीय प्रेयसीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. अविनाश बबन गिरी (वय ३४, रा. तरडे, ता. हवेली) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रेयसी आणि अविनाश गिरी याचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. हे दोघेही गुरुवारी दुपारी भेटणार होते. त्यानुसार फिर्यादी भेटण्यासाठी निघाल्या होत्या. तेव्हा कुंजीरवाडी येथील एका हॉटेलच्या बाहेर त्यांना अविनाश गिरी याची गाडी आढळून आली. म्हणून त्या हॉटेलमध्ये गेल्या.

त्यावेळी तो तेथे बसून दारु पित फोनवर कोणाशी तरी अश्लिल भाषेत बोलत होता. फिर्यादी यांनी "तू कोणाबरोबर असे घाणेरड्या भाषेत बोलत आहेस", असे विचारले असता त्याने फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांच्या हाताच्या अंगठ्याजवळ दुखापत झाली आहे.

याबाबत फिर्यादी प्रेयसी यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अविनाश गिरी याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार करे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Setu EV Toll Waiver : इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर आजपासून टोलमाफी; पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि 'समृद्धी' वरही दोन दिवसांत लागू

Chandrakant Patil : व्हिजन ठेवल्यास समाजाचा सर्वांगीण विकास, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला; ‘सकाळ प्लस स्टडीरूम’च्या ई-पेपरचे प्रकाशन

Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी खरंच होती का? डच पाहुण्यांना नेमका कसा केला होता पाहुणचार?

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

SCROLL FOR NEXT