railway  sakal
पुणे

Pune : ठाणे ,पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या माळशेज रेल्वे मार्गाचा प्रश्न लवकर मार्गी लावा प्रवाशांची मागणी

अनेक वर्ष राज्य माळशेज रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून आजपर्यंत मोठा संर्घष केला\

सकाळ वृत्तसेवा

राजेश कणसे

आळेफाटा - तब्बल २५ वर्षापेक्षा अधिक कालखंड रखडलेल्या शिवाय ठाणे ,पुणे व अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरू पहात असलेल्या माळशेज रेल्वे मार्ग लवकरात लवकर मार्गी लागावा अशी मागणी प्रवाशांमधुन होत आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

या बाबत मिळालेल्या माहीती नुसार माळशेज रेल्वे कृती समितीने हा मार्ग व्हावा म्हणून आज पर्यंत अनेक वर्ष राज्य माळशेज रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून आजपर्यंत मोठा संर्घष केला आहे. या मार्गाचे तांत्रीक सर्व्हेक्षण एक वर्षापच पूर्ण करण्यात आले असल्याची माहीती समजते. तसेच हा मार्ग कल्याण , अंबरनाथ ,मुरबाड ,माळशेज घाट ,ओतूर ते नगर असा जाणार असून या मार्गावर कल्याण ,विठ्ठलवाडी,उल्हासनगर,अंबरनाथ कांभा रोड ,आपटी, पाटगाव,मुरबाड ,राव ,डाहेरी मिल्हे, नागतार केबिन ,वारीवघर केबिन ,देवरूखवाडी

केबिन ,मढ ,जुन्नर रोड, ओतूर ,पादरवाडी,आळेफाटा, ,माळवाडी ,कोटडावाडी ,शिंदेवाडी ,वासुंदे, धोत्रे ,भाळवणी, हमीदपूर आणि अहमदनगर अशी रेल्वे स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहे .हा रेल्वे मार्ग पूर्णतः फायद्यात असल्याचे सांगण्यात येत असुन माळशेज पट्टा व ग्रामीण भागातील विकासाला चालना देणारा प्रकल्प आहे.

माळशेज रेल्वे धावल्यास ठाणे ,पुणे व नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दूरची बाजारपेठ नजीक उपलब्ध होणार असून या भागातील शेतक-यांणा आपल्या शेतातील माल मुंबई या ठिकाणी विकण्यासाठी दररोज नेता येणार आहे.

त्यांना उत्पन्नाचा नवीन पर्याय मिळणार आहेत,तसेच जुन्नर,आंबेगाव ,पारनेर या तालुक्यातील लाखो जण नोकरीसाठी मुंबई या ठिकाणी साठी गेलेले आहेत त्यांणा हा प्रकल्प झाल्यास दररोज अपडाऊन करता येईल.शिवाय पर्यटनं व्यवसायाला देखील चालना मिळणार असून पर्यटन क्षेत्रात जुन्नर तालुक्यात माळशेज रेल्वे क्रांती निर्माण करेल असा तज्ञांकडून अंदाज वर्तवीला जात आहेत .

यापलीकडे नगर -औरंगाबाद मार्गे पुढे विशाखापट्टणम हा मार्ग देखील जवळ होऊन जोडला जाऊ शकतो ,त्यामुळे हा नवा माळशेज रेल्वे मार्ग ठाणे ,पुणे व नगर या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विकासाचे नवीन पर्व घेऊन येणार असे वाटते आहे.

तसेच हा मार्ग होण्यासाठी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डाँ. अमोल कोल्हे तसेच माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील तसेच जुन्नर चे विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे यांनी पुढाकार घेऊन शासन दरबारी मांडुन हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Live Update : दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू,चार जखमी

ICC Women’s World Cup 2025 Points Table: भारताच्या पोरींनी शेजाऱ्यांना त्यांची जागा दाखवली, पाकिस्तानची गुणतालिकेत गोची केली

PMC News : बांधकाम परवानगीचे अधिकार द्या; समाविष्ट गावांबाबत पुणे महापालिकेचे राज्य सरकारला पत्र

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

SCROLL FOR NEXT