कचरा कुंडी sakal
पुणे

पुणे : उड्डाणपूला खाली बनली कचरा कुंडी

वाजपेयी उड्डाणपूलाखाली गेल्या अनेक महिन्यांपासून एक वृद्ध बसलेले असतात

सकाळ वृत्तसेवा

महर्षी नगर : शंकर शेठ रस्त्यावरील अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपूला खाली मोठया प्रमाणात कचरा गेल्या अनेक महिन्यांपासून पडला आहे आरोग्य खात्याचे याकडे दुर्लक्ष होत आहे, पादचारी नोकरदारांना वाहनचालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे, रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून चिकन मांस आदी टाकले जातात.

वाजपेयी उड्डाणपूलाखाली गेल्या अनेक महिन्यांपासून एक वृद्ध बसलेले असतात, वृद्धाचे नातेवाईक जवळच्या झोपडपट्टी भागात राहत असल्याची माहिती मिळाली.तसेच वखार महामंडळ ते डायस प्लॉट दरम्यान सोळाशे मीटर लांबीचा बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूलाखालील जागेत देखील नागरिक कचरा टाकत असल्याने उड्डाणपूलाचे विद्रुपीकरणासह आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे, कचऱ्याच्या प्रश्नामुळे परिसराच्या सौंदर्याला देखील बाधा पोहोचत आहे.

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय आरोग्य निरीक्षक विक्रम काथवटे यांना विचारले असता ते म्हणाले सदर कचरा काढण्यासाठी कर्मचारी पाठवण्यात येतील, सायंकाळच्या सुमारास कचरा, टाईल्स चा माल, विनावापर मांसाहारी माल टाकण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी सीसीटीव्ही लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवर घनकचरा विभागाला कळवून विद्युत विभागाला प्रस्ताव देणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा लढा आता मुंबईत, कसं असेल मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं स्वरुप? वाचा...

Pune News : 'तो' तरुण सिंहगडावरुन बेपत्ता झालाच नाही, प्रकरणाला वेगळं वळणं ; नेमकं काय घडलं?

Sanju Samsonचे ट्वेंटी-२०त वेगवान शतक; आता Asia Cup मध्ये त्याला सलामीला खेळवायचं की नाही, हे निवड समितीनं ठरवायचं...

Latest Marathi News Updates : फडणवीस वाकड्यात घुसतात, म्हणून मी असं बोलतो – मनोज जरांगे

Adani Group: एका वर्षात अदानी समूहाचे कर्ज 20 टक्के वाढले; सरकारी बँकांनी किती कोटी दिले?

SCROLL FOR NEXT