police sakal
पुणे

Pune : अवैध रिक्षाथांबा हटविला, विद्युत खांब हटविण्यासाठी मनपाला पत्र- साळुंखे

वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

अशोक बालगुडे

उंड्री : कडनगर चौकामध्ये वाहतूक सुरळीत राहावी, वाहनचालक, पादचाऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी वाहतुकीला अडथळा ठरणारा अवैध रिक्षा थांबा हलविला असून, विद्युत खांब हलविण्यासाठी पालिका प्रशासनाला पत्र दिले आहे, असे हांडेवाडी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी साळुंखे यांनी सांगितले.

कडनगर चौकामध्ये वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांसाठी बेंच (बाक) बसविण्यात आला. याप्रसंगी पोलीस हवालदार संदीपकुमार गोवेकर, महेश कांबळे, युवराज जाधव आणि स्थानिक विश्वास कड, संतोष कड, रोहित पाटील, सचिन साठे, मयूर कड, विजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

साळुंखे म्हणाले की, उंड्रीमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या मोठी आहे, तसेच पाण्याच्या टँकरची वर्दळ सतत असते. नोकरी व्यवसायानिमित्त शहर-उपनगराकडे ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी असून, शाळा-महाविद्यालये सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी चौकामध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, विश्वास कड म्हणाले की, स्कूल बस आणि पाण्याच्या टँकरची संख्या मोठी असून, अरुंद रस्त्यामुळे वाहतूककोंडी होते. पालिका प्रशासनाने रस्तारुंदीकरण करून सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT