Prakash Javadekar sakal
पुणे

MP Prakash Javadekar : लोकसभेच्या ३५० पेक्षा जास्त जागा जिंकू; जावडेकर

जावडेकर म्हणाले, मोदींमुळे भारताला स्थिरता, विकास, गरीब कल्याण आणि जगात मानाचे स्थान मिळाले.

सकाळ वृत्तसेवा

MP Prakash Javadekar - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'देश प्रथम' निती त्यासाठी सतत कष्ट आणि 'सन्यस्त कर्मयोगी' ही प्रतिमा देशाला पुढे नेत आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे ३५० पेक्षा जास्त तर एनडीएचे ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील, असा विश्‍वास माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.

केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल माहिती आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश जावडेकर बोलत होते. राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, धनंजय जाधव, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले आदी यावेळी उपस्थित होते.

जावडेकर म्हणाले, मोदींमुळे भारताला स्थिरता, विकास, गरीब कल्याण आणि जगात मानाचे स्थान मिळाले, लोकांचा मोदींवर विश्वास असल्याने ती आमची मोठी ताकद आहे, या ताकदीवर पुन्हा सत्तेत येऊन २०२४ नंतर विकासाची गती आणखी वाढेल.

मोदींनी विकासाचे सकारात्मक राजकारण करत जात, धर्म, प्रांत, लिंग, यावर भेद केला नाही. स्वच्छ भारत, डिजिटल भारत, नागरिकांनी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, शाश्वत विकास, घर घर तिरंगा अशा अनेक योजनांमध्ये सहभाग घेतला. गेल्या ९ वर्षात देशातील दहशतवादी हल्ले थांबले, नक्षलवाद्यांचा ९० टक्के प्रभाव कमी झाला, शांतता निर्माण झाली आहे.

दरम्यान, गॅस पेट्रोल दरवाढीबाबत विचारले असता रशिया युक्रेन युद्धामुळे गॅस आणि पेट्रोलचे दर वाढले आहेत.’’ असे जावडेकर यांनी सांगितले.

पहिल्या पाच देशात भारत

२०१४ पूर्वी भारत हा पहिल्या पाच कमकुवत अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत होता. पण आता भारत हा सर्वात मोठ्या पाच अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. डिजिटल इंडिया मोहिमेने अद्भुत यश मिळवले.

जगात सर्वात जास्त डिजिटल व्यवहार भारतात होतात, भीम, यूपीआय, को-विन ही ॲप जगभर सर्वोत्कृष्ट ठरली. जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारा देश भारत ठरला आहे. युरोपातील अनेक देशात मंदीचे सावट असताना भारताची वेगवान प्रगती चालू आहे. गरीबी एक टक्के पेक्षा कमी आणि बेरोजगारीचा दरही कमी झाला आहे, असा दावा जावडेकर यांनी केला.

मोदी सरकारची नऊ वर्षातील कामगिरी

- ५० हजार किलोमीटरचे नवे महामार्ग, ७० नवे विमानतळ, १११ नवे जलवाहतूक मार्ग, २० शहरात मेट्रो, 18 वंदे भारत एक्स्प्रेस

- १०० कोटी नागरिकांना मोफत कोविड प्रतिबंधक लस,५० कोटी नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार

-११ कोटी शेतकऱ्यांना शेत सुधारण्यासाठी प्रत्येकी 26 हजार रुपये, ४८8 कोटी नागरिकांची जनधन खाते.

- ११ कोटी घरात शौचालय, १० कोटी महिलांना उज्वल गॅस योजना, १० कोटी घरात नव्याने नळ जोडणी,

- ३.५ कोटी कोटी नागरिकांना प्रधान मंत्री आवास योजनेचा लाभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT