पुणे

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या - हर्षवर्धन पाटील

इंदापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने फळबागा व इतर शेती पिकांचे नुकसान झाले.

डॉ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने फळबागा व इतर शेती पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने फळबागा व इतर नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजप नेते तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यात बुधवार, गुरुवार व शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने द्राक्षे,केळी, डाळिंब आदी फळबागांचे तसेच कांदा, शेवगा व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. इंदापूर तालुक्यात ७० ते ८० मिली मीटर एवढा उच्चांकी पाऊस झाला आहे. इंदापूर तालुक्यात डिसेंबर महिन्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे फळबागा व इतर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी झालेल्या आर्थिक नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अजूनही कोरोनाचे संकट शेतकऱ्यांवर असल्याने केळी सह शेती पिकांना चांगला बाजारभाव मिळालेला नाही. त्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात भर पडली आहे. त्यामुळे शासनानेअवकाळी पावसाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा, असे आवाहन शेवटी हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT